कराड
सहकार क्षेत्रात सर्व चांगल्या लोकांनी एकत्रित येऊन निस्वार्थी भावाने काम केल्यास उदिष्ट्पुर्ती होते. त्यासाठी समर्पित भावनेने काम करणे गरजेचे असून ते जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक, पदाधिकारी करीत आहेत. सहकार क्षेत्रात जनकल्याण चे अत्यंत चांगले काम केले आहे असे गौरोवोद्गार केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांनी काढले.
येथील हॉटेल पंकज येथे आज शनिवारी २५ रोजी जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने देण्यात येणारा द्वितीय 'जनकल्याण गौरव पुरस्कार' केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत एहसास मतीमंद मुलांचे वसतिगृह, वळसे जि. सातारा या संस्थेस प्रदान करण्यात आला. एक लाख रुपयांचा धनादेश, शाल, श्रीफळ, मानपत्र व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप होते. एहसासचे अधीक्षक संजय कांबळे यांना हा पुरस्कार देण्यात आला. याप्रसंगी मंत्री गडकरी बोलत होते.
यावेळी जनकल्याण पतसंस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर देशपांडे, उपाध्यक्ष डॉ. मिलिंद पेंढारकर, पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष अनिरुध्द देशपांडे, संस्थेचे संचालक सीए. शिरीष गोडबोले, डॉ. अविनाश गरगटे, डॉ. प्रकाश सप्रे, एहसासचे अधीक्षक संजय कांबळे, निवड समितीचे सदस्य रवींद्र कर्वे, प्रमोद कुलकर्णी, गोविंद मोकाशी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment