ते म्हणाले हसन मुश्रीफ यांच्यावर यापूर्वी इन्कमटेक्स ची रेड पडली होती आता त्यांच्या घर आणि ऑफिसवर इडी ची रेड टाकल्याचे कळतंय उगाचच एखाद्याला टार्गेट करून समाजातून उठवायच काम हे लोक करत आहेत त्याला कायदेशीर उत्तर मुश्रीफ देतील मात्र यापूर्वी संजय राऊत असतील देशमुख असतील यांच्याबाबतीत हेच झालं राज्यातील याबाबत काम करणाऱ्या यंत्रणा केंद्र आणि राज्याच्या सांगण्यावरून काम करत आहेत हे लोकशाहीला घातक आहे असे यापूर्वी कधीही होत नव्हतं असेही आ पाटील यानी यावेळी नमूद केले
काही महापालिकामध्ये स्वीकृत नगरसेवकांची संख्या वाढवण्यासाठी हे सरकार आग्रही आहे स्वीकृत नगरसेवकांची संख्या ही त्या त्या ठिकाणच्या सदस्य संख्येच्या टक्केवारीवर अवलंबून असते मात्र आम्ही लोकांसाठी काहीतरी करतोय हे प्रलोभन दाखवण्याचा त्यामागील हेतु असल्यामुळे स्वीकृत संख्या वाढवण्याचे सरकारचे प्रयोजन दिसते असा आरोपही आ पाटील यांनी यावेळी केला
राज्यतील शिंदे -फडणवीस सरकारवर आ पाटील यांनी हल्ला चढवत या सरकारच्या एकूणच कार्यपद्धतीची चांगलीच चिरफाड केली यावेळी केलेल्या भाषणात भाजप नेत्यांनी छत्रपती शिवराय व संभाजीराजे यांच्याबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याचाही त्यांनी चांगलाच समाचार घेतला तसेच नामदार चंद्रकांत पाटील यांनी "भीक' हा शब्दप्रयोग करत महापुरुषांबद्दल केलेल्या विधानाचाही आमदार पाटील यांनी यावेळी समाचार घेतला हे सरकार नियमबाह्य असल्याचेही माध्यमांशी बोलताना ते म्हणाले
No comments:
Post a Comment