Monday, January 2, 2023

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले वादग्रस्त विधान ; म्हणाले ,औरंगजेब खरंच क्रूर असता तर...चूक लक्षात येताच सारवासारव करण्यासाठी घेतली आणखी एक पत्रकार परिषद ; त्यावेळीही केली पुन्हा चूक ;

वेध माझा ऑनलाइन - विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनात छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हे तर स्वराज्य रक्षक होते, असं विधान केलं. अजित पवारांच्या या विधानावरून वाद निर्माण झाला, तसंच भाजपने अजित पवारांनी माफी मागावी अशी मागणी केली. अजित पवारांची बाजू लावून धरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारानी वादग्रस्त विधान केलंय. या वादग्रस्त विधानानंतर सारवासारव करण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी आणखी एक पत्रकार परिषद घेतली, पण त्यातही जितेंद्र आव्हाड यांनी चूक केली.

'संभाजी महाराजांचे डोळे फोडले त्याठिकाणी विष्णूचं मंदीर होतं, ते औरंगजेबाने तोडलं नाही, तो क्रूर असता तर त्याने विष्णूचं मंदीर तोडलं असतं ना,' असं विधान जितेंद्र आव्हाड यांनी केलं. या विधानामुळे वाद होईल हे लक्षात आल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी पुन्हा लगेचच पत्रकारांना बोलावून दुसरी प्रतिक्रिया देत औरंगजेब क्रूर होता, अशी सारवासारव केली, पण ही सारवासारव करताना जितेंद्र आव्हाड यांनी आणखी एक चूक केली.

औरंगजेबाचा मृत्यू औरंगाबादमध्ये झाल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. औरंगजेबाचा मृत्यू नगर जिल्ह्यातल्या भिंगारमध्ये झाला होता, पण औरंगजेबाच्या इच्छेनुसार औरंगाबादमध्ये त्याचा दफनविधी करण्यात आला होता. दरम्यान औरंगजेबाच्या मृत्यूबाबत आपण चुकीची माहिती दिल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी मान्य केलं आहे.
वादग्रस्त वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा स्पष्टीकरण दिलं, ज्यात ते औरंगजेब क्रूर होता, असं ते म्हणत आहेत. 'औरंगजेब किती क्रूर होता हे इतिहासात लिहून ठेवलं आहे. त्याने भावाला, वडिलांना मारलं आणि गादीवर बसला. औरंगजेब क्रूरच होता पण त्याला महाराष्ट्र कधीही जिंकता आला नाही,' असं स्पष्टीकरण जितेंद्र आव्हाड यांनी दिलं आहे.


No comments:

Post a Comment