वेध माझा ऑनलाईन - राम राम हा आदराचा शब्द आहे. मात्र, जय श्रीराम म्हटलं की, धडकी भरतेय असं म्हणत जय श्रीराम म्हणण्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरींनी विरोध करत नव्या वादाला तोंड फोडलंय. तर कालचा भारत चांगला होता. मात्र, आजचा भारत दुषित केल्याची खंत व्यक्त करत देशात रंग,जातीवरुन राजकारण केलं जातं. मात्र, यापलीकडेही देश आहे, याचा विचार व्हायला हवा, असे म्हणत अमोल मिटकरींनी केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधाला.
पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे साहेबराव बुट्टेपाटील स्मुर्ती व्याख्यानमाला कार्यक्रमात "उज्ज्वल भारताचे कालचे आजचे आणि उद्याचे स्वप्न" या विषयावर मिटकरींनी व्याखान दिले. यावेळी मोठ्या संख्येने महाविद्यालयीन तरुण तरुणी उपस्थित होते.
काय म्हणाले अमोल मिटकरी -
राजगुरुनगर येथील साहेबराव बुट्टेपाटील स्मुर्ती व्याख्यानमालेच्या कार्यक्रमात बोलताना अमोल मिटकरींनी जय श्रीराम म्हणल्यावर धडकी भरतेय असं म्हटलं. आंदोलनावेळी जय श्रीराम म्हटलं जातं. मग रामाने दहशत शिकवलीय का? रामाने सावत्र भाऊ असलेल्या भरताला नंदीग्रामची गादी दिली. मग ज्याचं जय श्रीराम वर प्रेम असेल त्यांनी स्वत:च्या सख्ख्या भावाला दोन एकर शेती तरी द्यावी. रामाने भावाचा आदर केला मग जय श्रीराम करणाऱ्यांनी याचा विचार करायला हवा. जसं वंदे मातरम या नावाची दहशत तशीच जय श्रीरामच्या नावाची दहशत माजविण्याचे काम या सरकारमधील लोक करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला
No comments:
Post a Comment