कोकण किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून पुढील दोन ते तीन दिवस या भागामध्ये मुसळधार पाऊस होईल. तर, सिंधुदुर्ग जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.सिंधुदुर्गला रात्रभर पावसाने झोडपून काढले आहे.
पावसाचा सर्वाधिक जोर हा सह्याद्रीच्या खोऱ्यात पाहायला मिळत आहे. यामुळे कर्ली नदी, गडनदी, तेरेखोल नदी या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. आजही कोकणातील बऱ्याच भागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
‘या’ जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
हवामान विभागाने आज कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय.
No comments:
Post a Comment