मोसमी पावसाचे आगमन झाल्याने गेल्या काही दिवसांपासून तापमानात प्रचंड घट झाली आहे. नागरिकांना आता उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या राज्यातील बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झालंय. गेल्या आठवड्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडूनही गेलाय.आता पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्यानं विदर्भासाठी एक महत्त्वाचा इशारा दिला आहे पुढील 5 दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट?
बहुतांश जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे. अहमदनगर, पुणे व सोलापूर तर मराठवाड्यात आज लातूर व धाराशिव या जिल्ह्यांमध्ये वीजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
विदर्भात अकोला, बुलढाणा, वाशिम व यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आजपासून पुढील पाच दिवस तर अमरावती व वर्धा जिल्ह्यात आज वादळीवारा व पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबईत पाऊस
दरम्यान, राज्यात सध्या मॉन्सून अमरावती व चंद्रपूरपर्यंत पोहोचला आहे. तर मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट् देखील मॉन्सूनने व्यापला आहे. नवसारी, जळगाव, अमरावती, चंद्रपूर, बिजापूर, सुकमा, मलकानगरी आणि विजयानगरम येथे सध्या मॉन्सून सक्रिय झाला आहे.दुसरीकडे मुंबईत सध्या जोरदार पाऊस बरसत आहे. काल मुंबईत सकाळी हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. मात्र, या पावसामुळे शहरातील अनेक भागात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. पुण्यातही मागील आठवड्यात झालेल्या पावसाने नागरिकांचं बरंच आर्थिक नुकसान झालं होतं.
No comments:
Post a Comment