लोकसभा निवडणुकीत बीड जिल्हा चांगलाच चर्चेत राहिला आहे. कारण बीड लोकसभा निडणुकीत भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. अशातच पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर त्यांना राज्यसभेवर पाठवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बीड लोकसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसलेल्या पंकजा मुंडे यांना आता राज्यसभेवर पाठवले जाण्याची शक्यता वर्तवली आहे. कारण भाजपच्या गोटात त्यादृष्टीने हालचाली देखील सुरु झाल्याची माहिती मिळत आहे. दिल्लीत नुकतीच भाजपच्या दिग्गज नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवण्यासंदर्भात चर्चा झाली आहे.
राज्यसभेत पीयूष गोयल आणि उदयनराजे भोसले यांच्या जागा रिक्त आहेत. कारण ते लोकसभेवर निवडून आल्याने त्यांच्या राज्यसभेतील जागा रिक्त झाल्या असल्याने भाजपने निर्णय घेतला आहे. पीयूष गोयल आणि उदयनराजे भोसले यांच्या जागा रिक्त झाल्याने त्यापैकी एका जागेवर पंकजा मुंडे यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. जर तसे घडले तर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या पराभवामुळे निराश झालेल्या त्यांच्या समर्थकांना मोठा दिलासा मिळू शकतो.
No comments:
Post a Comment