Saturday, May 30, 2026

डॉ सुरेश भोसले म्हणाले...अविनाश मोहितेंच्या काळात कारखाना विकावा लागला असता ; त्यांच्या काळात 1 हजार कामगार कामाला असल्याचे दाखवले, त्यांचा 5 हजार रुपये दरमहिना पगार दाखवला, कागदावर मात्र आजअखेर काहीच दिसत नाही, मग महिन्याला 50 लाख गेले कुठे?

वेध माझा ऑनलाईन।
अविनाश मोहिते कृष्णा कारखान्याचे चेअरमन असताना कारखान्याची अक्षरशः वाट लागली होती त्यांच्या सारखी प्रवृत्ती फोफावली तर कारखाना विकावा लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती 
मात्र आपण कारखाना हातात घेतल्यानंतर कारखाना पुन्हा सुस्थितीत आला असल्याचे डॉ सुरेश भोसले म्हणाले

कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी सहकार पॅनेलचा प्रचार शुभारंभ काल - शनिवारी  वडगाव हवेली येथे पार पडला त्याप्रसंगी सभासद शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते  माजी चेअरमन मदनदादा मोहिते, आमदार अतुल भोसले, जगदीश जगताप, रयत संघटनेचे धनाजी काटकर सर, व परिसरातील कार्यकर्ते सभासद  तसेच महिला युवक शेतकरी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते

डॉ सुरेश भोसले म्हणाले
ज्या अविनाश मोहितेना साध्या सोसायटीच्या सदस्य पदाचा अनुभव नाही अशा माणसाला एवढी मोठी सहकारी संस्था कशी चालवता येणार? आणि त्याचमुळे खरतर कारखाना त्यांच्या काळात अडचणीत आला त्यांना कारखानदारी मधले काहीच कळत नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली 

त्यांनी व्यापारी कर्ज 15 कोटी करून ठेवले, कारखान्याची वीज, तसेच पाणी कट करण्यात आले होते, तोडणी वाहतुकीला पैसेच शिल्लक नव्हते,अग्रीकल्चर कॉलेज बंद करण्यात आले होते, डिस्लरी बंद केली होती, तोडणी कामगारांना पैसे दिले नाहीत म्हणून त्या कामगारांनी संप केला होता, 
तसेच 1000 कामगार 5 000 रुपये महिना पगाराने कारखान्यात कामाला असल्याचे दाखवून महिन्याला 50 लाख रुपये त्यांच्या पगारापोटी खर्च केले... मात्र... हे कामगार आजअखेर कागदावर कुठेच दिसत नाहीत... मग हे प्रत्येक महिन्याला 50 लाख रुपये गेले कुठे?... असा सवालही त्यांनी यावेळी केला.

ते म्हणाले... अशी बिकट परिस्थिती अविनाश मोहितेंच्या काळात होती आणि त्या परिस्थितीत हा कारखाना आपण ताब्यात घेतला मात्र अथक प्रयत्नाने हा कारखाना सध्या राज्यात अववल दर्जाचा म्हणून सध्या डौलाने उभा आहे, सुस्थितीत आहे... 
अविनाश मोहितें सारखी प्रवृत्ती फोफावली असती तर कारखाना विकावा लागला असता अशी भोतीही त्यांनी बोलून दाखवली 

ते म्हणाले
गेल्या 5 वर्षात आपल्या काळात कृष्णा कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यात आम्हाला यश मिळाले आहे उच्चांकी ऊसदर आम्ही दिला आहे  कामगारांना वेळोवेळी पगारवाढ दिली आहे सभासदांना सर्वतोपरी सुविधा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहिलो आहे तसेच कारखान्याचे एक्सपानन्शन केले आहे  गाळप क्षमता वाढवली आहे विस्तारीकरण तसेच नूतनीकरण देखील कारखान्यात केलेलं आहे या व अशा अनेक बाबींमुळे कारखाना आजच्या घडीला राज्यात अववल क्रमांकावर आहे . 
मागील निवडणुकीप्रमाणे याही निवडणुकीत सहकार पॅनलचा मोठ्या मताने विजय होईल असा विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखवला...

No comments:

Post a Comment