वेध माझा ऑनलाइन।
पश्चिम महाराष्ट्रातील प्रवासी पुणे ते सातारा मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. पुणे-बंगळुरू महामार्गावर अपघातांचे वाढते प्रमाण आणि वाहतूक कोंडी पाहून या भागांत पायाभूत सुविधा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. NHAI च्या या उपाययोजनांमुळे पुणे ते सातारा कॉरिडोरवरील वाहतूक सुलभ होण्याची शक्यता आहे.
केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरींनी या मार्गाचा विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी अलीकडेच खंबाटकी घाट आणि नवले पूल परिसराची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी पुणे ते सातारादरम्यान पाच ते सहा उड्डाणपूल उभारण्याची योजना मांडली. सध्या पुणे ते सातारा प्रवासा 1.30 ते 2 तास वेळ जातो. वाहतूक कोंडी असली तर सव्वा दोन तास तर हमखास जातात. त्यात साताऱ्यातून पुढे गावात जाणाऱ्या वाहनांना तर आणखी वेळ लागतो. हाच प्रवासाचा वेळ अवघ्या 1 तासावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही शहरांमधील वाहतूक सुरळीत होईल अशी अपेक्षा आहे.
No comments:
Post a Comment