स्वच्छ सर्व्हेक्षण स्पर्धेसाठी याहीवेळी कराड सज्ज आहे. आम्ही शहराच्या विकासासाठी सुमारे 97 कोटींचा विकास आराखडा तयार असून यातील 38 विकासकामांना काही महिन्यात चालना देऊन कराड शहर स्मार्ट शहर बनवणार असल्याची ग्वाही जनशक्ती आघाडीचे गटनेते राजेंद्रसिंह यादव यांनी दिली.
नगरपालिकेत पत्रकार परिषदे दरम्यान त्यांनी विकासकामांबाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, शहराच्या विकासाचा नवा संकल्प येत्या चार महिन्यात पुढे नेणार असून जनशक्ती
आघाडीने कराड शहराच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प केला आहे. स्वच्छ आणि सुंदर
कराडला स्मार्ट बनविण्यासाठी 40 विकासकामांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले असून ही कामे पूर्ण झाल्यानंतर कराड शहर आणखी स्मार्ट होणार असल्याचा विश्वाशी यादव यांनी व्यक्त केला.
या विकासकामांमध्ये यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन बगीचा (3 कोटी), प्रीतिसंगम उद्यान
विकसित करणे (1.5 कोटी), प्रीतिसंगम बागेत स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या
जीवनपट माहितीसाठी हॉल बांधणे (50 लाख), आदरणीय पी. डी. पाटील उद्यान विकसित
करणे (50 लाख) ही कामे निसर्ग पर्यटन योजनेतून करण्यात येणार आहेत. दरम्यान
नगरपालिकेने महिला बचत गटांना चालना दिली आहे. बचत गटातील महिला विविध
उत्पादने करत आहेत. या उत्पादनांना छत्र मिळण्यासाठी बचत गट संकुल उभारण्याचा
संकल्प असून वैशिष्टय़पूर्ण योजनेतून यासाठी 2 कोटींची तरतूद करण्यात येणार
आहे.
पार्ले (ता. कराड) येथे शासनाने नगरपालिकेला जागा दिली आहे. या जागेवर
अतिक्रमणे होत असल्याने संपूर्ण जागेला संरक्षक भिंत बांधण्यात येणार आहे.
त्यासाठी वैशिष्टय़पूर्ण योजनेतून 2 कोटींची मागणी करण्यात येणार आहे. या जागेत
1 मेगा वॅट क्षमतेचा सौर पार्क उभारण्याचा संकल्प असून यासाठी 5 कोटींचा
प्रस्ताव वैशिष्टय़पूर्ण योजनेतून सादर करण्यात येणार आहे. विशेष वैशिष्टय़पूर्ण
योजनेतून सौर ऊर्जा प्रकल्पाचा आराखडा राबवण्यात येणार असून यासाठी 12 कोटी
रूपये खर्च करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे नगरपालिकेच्या विज बिलाची
कोटय़वधी रूपयांची बचत होणार आहे. भुयारी विद्युत वाहिन्यांसाठी विशेष
वैशिष्टय़पूर्ण योजनेतून 12 कोटींची तरतूद करण्यात येणार आहे.स्वर्गीय यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दीनिमित्त नगरपालिकेस प्राप्त झालेल्या निधीतून 1
कोटी रूपये खर्चून यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनावरील शिल्पसृष्टी उभारून त्यांचे काम नव्या पिढीसमोर नेण्यात येणार आहे. बसस्थानकासमोर बहुमजली पार्किंग उभारण्यात येणार आहे. हे काम लवकरच सुरू होणार असून यासाठी 3.25 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. यु. डी. 6 योजनेतून छत्रपती संभाजी मार्केटवर दुसरा मजला बांधणे (1.50 कोटी), आरक्षण क्रमांक 68 ही ट्रान्सपोर्ट इमारत बांधणे (7 कोटी), आरक्षण क्रमांक 38 मध्ये (3 कोटी) ही महत्वाकांक्षी कामे
हाती घेण्यात येणार आहेत. विशेष रस्ता अनुदानातून दत्त चौक ते प्रीतिसंगम बाग रस्ता कारपेट (1.70 कोटी), चावडी चौक ते कन्या प्रशाला रस्ता कारपेट (40 लाख) करण्यात येणार असल्याचेही राजेंद्रसिंह यादव यांनी सांगितले. अग्नि सुरक्षा निधीतून 90 लाख खर्चून फायर स्टेशनची इमारत बांधण्यात येणार आहे. अग्निशमनची नवी गाडी व अत्याधुनिक साहित्य खरेदीसाठी 1 कोटी रूपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे.जिल्हास्तर नगरोत्थानमधून 58 लाख खर्चून शुक्रवार पेठेत रंगारवेस मारूती मंदिरसमोर संरक्षक भिंत बांधण्यात येणार आहे. जिव्हेश्वर मंदिरशेजारी नागझरी नाल्यावरील पुलाशेजारी बाधित होणारे मोरे कुटुंबीयांना नगरोत्थानमधून 1.40 कोटींची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतून 3 कोटी रूपयांचा घरकुल प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. क्रीडा संस्कृती कार्यक्रम निधीतून ओपन जिम, दिव्यांगांसाठी जिम (70 लाख), प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेतून फिश मार्केट (1.75 कोटी), पंधराव्या वित्त आयोगातून 50 लाख खर्चून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प विकास, 16 व्या वित्त आयोगातून 1.50 कोटी खर्चून घनकचरा प्रकल्पातील उद्यान विकास, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेतून 50 लाख खर्चून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसर विकास (50 लाख), याच योजनेतून महात्मा जोतिबा फुले स्मारकभोवतीचा परिसर विकास (25 लाख) ही कामे हाती घेण्यात येणार आहेत. घनकचरा प्रकल्पातून उत्पन्न वाढवण्यासाठी जनरल फंडातून 12 लाख खर्चून कामे हाती घेण्यात येणार आहेत.अल्पसंख्याक योजनेतून 30 लाखाची अल्पसंख्याक वस्तीतील कामे हाती घेण्यात येणारआहेत. शिवाजी स्टेडियममधील क्रीडा विषयक सुविधांची दरवाढ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या नूतनीकरणासाठी 40 कोटींचा आराखडा असून हा प्रस्ताव खासदार उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून केंद्र सरकारला सादर करण्यात येणार आहे. देशात सलग दोन वर्षे आलेल्या कराड नगरपालिकेची मुख्य इमारतीची दुरूस्ती व रंगरंगोटी करण्यासाठी जनरल फंडातून 25 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. तरूणांसाठी शहरात मोफत वाय फाय सुविधा सुरू करण्यात येणार असून यासाठी 30 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. 40 कामांपैकी काही कामांची तरतूद नगरपालिकेने केली आहे. काही निधी प्राप्त झाला आहे. काही निधीसाठी प्रस्ताव सादर करायचे आहेत,याबरोबरच वाढीव भागातील भुयारी गटर योजना व चोवीस तास पाणी योजनाही लवकरच कार्यान्वित करणार असल्याचे राजेंद्रसिंह यादव यांनी सांगितले. दत्त चौक शिवतीर्थ विकसितUकरणार दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा असणारा आयलॅण्ड शिवतीर्थ म्हणून विकसित करण्यात येणार आहे. यासाठी नगरपालिकेच्या जनरल फंडातून 50 लाख रूपयांचे कामे प्रस्तावित करण्यात येणार आहेत. शहरातील सर्व महामानवांच्या स्मारकांचे नूतनीकरणासाठी जनरल फंडातून 25 लाख रूपयांची तरतूद करण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment