वेध माझा ऑनलाइन - गेल्या काही दिवसांपासून राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्या कमी होत आहे. आरोग्यमंत्रालयाने दिलेल्या महितीनुसार, मागील 24 तासांत राज्यात 9 हजार 666 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 25 हजार 175 जणांची कोरोनावर मात केली आहे. याच कालावधीदरम्यान 66 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
राज्यात आज 66 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद -
राज्यात आज 66 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.83 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 75 लाख 38 हजार 611 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.60 टक्के आहे. सध्या राज्यात 7 लाख 24 हजार 722 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 2394 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 55 लाख 54 हजार 798 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहेत, त्यापैकी 78,03,700 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.
सलग तीन दिवसांपासून राज्यात ओमायक्रॅानचा एकही नवा रुग्ण आढळला नाही. आतापर्यंत 3334 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 2023 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहेत.
देशातील कोरोनास्थिती -
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 12 लाख 25 हजार 11 इतकी झाली आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या साथीमुळे प्राण गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 1 हजार 979 झाली आहे. आकडेवारीनुसार, काल दोन लाख 13 हजार 246 लोक बरे झाले, त्यानंतर 4 कोटी 4 लाख 61 हजार 148 लोक संसर्गमुक्त झाले आहेत.
No comments:
Post a Comment