Thursday, February 17, 2022

राज्यात कोरोनासंख्या आटोक्यात येऊ लागली ; 2 हजार 748 नव्या रुग्णांची भर

वेध माझा ऑनलाइन - राज्यात कोरोनासंख्या आटोक्यात येऊ लागली असून बुधवारी 2 हजार 748 नव्या रुग्णांची भर पडली आहे राज्यात आज एकाही ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली नाही आतापर्यंत 4456ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात  झाली आहे. त्यापैकी 3334 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. सध्या राज्यात 1,122 ओमायक्रॉनचे रुग्ण अॅक्टिव्ह आहेत

राज्यात आज  40 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद

राज्यात आज 40 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 76 लाख  81 हजार 961 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.77 टक्के आहे.  सध्या राज्यात  2 लाख 51 हजार 023 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1146  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 68 लाख 76  हजार 774 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.

मुंबईत 255 नवे कोरोना रुग्ण आढळले

मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत 255 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 439 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील रिकव्हरी रेट 98 टक्के इतका झाला आहे. आज एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही. नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या 2 हजार 115 इतकी झाली आहे. आज नव्याने सापडलेल्या 255 रुग्णांपैकी 23 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.मुंबईत   259 नवे कोरोनाबाधित मुंबईत आज 259 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. गुरुवारच्या तुलनेत ही रुग्णसंख्या चारने वाढली आहे, कारण मंगळवारी 255 नव्या बाधितांची नोंद झाली होती. सलग तिसऱ्या दिवशी आजही मुंबईत एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही. तसंच कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी 2407 दिवसांवर आला आहे. कालच्या तुलनेत यामध्ये 202 दिवसांची वाढ झाली आहे. कारण मंगळवारी कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी 2205 इतका होता.

No comments:

Post a Comment