Tuesday, August 2, 2022

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि भाजप यांच्यात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत जवळपास चर्चा पूर्ण ! ; भाजप कडे जाणार गृहखाते...60-40 असा फॉर्म्युला ठरला ;अनेक नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी...खात्रीलायक वृत्त...

वेध माझा ऑनलाइन - राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि भाजप यांच्यात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत जवळपास चर्चा पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे. या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत टप्प्याटप्प्याने काही माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे येत्या 5 ऑगस्टला हा मंत्रिमंडळाचा विस्तार होणार हे निश्चित झाल्याची माहिती आहे. मंत्रिमंडळ विस्तारात कुणाकडे कोणती खाती असणार हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही. पण मिळालेल्या माहितीनुसार, भाजपला गृह विभाग हवं आहे आणि ते खातं भाजपकडेच जाण्याची दाट शक्यता आहे.

राज्यात अडीच वर्षांपूर्वी युतीचं सरकार होतं. त्यावेळी गृह खातं हे भाजपकडेच होतं. विशेष म्हणजे ते खातं तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याचकडे ठेवलं होतं. राज्यातील सुरक्षा यंत्रणेशी संबंधित हे खातं महत्त्वाचं आहे. त्यामुळे भाजपला हे खातं हवं आहे. भाजपने शिवसेनेला मुख्यमंत्रीपद दिल्याने गृहखातं हे भाजपकडेच जाणार असल्याची माहिती मिळतं आहे.सुरुवातीला 15 ते 16 मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे भाजप गृह खातं स्वत:कडे ठेवणार आहे. 60-40 असा मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरला आहे. या विस्तारात शिवसेनेतील शिंदे गटाच्या अनेक माजी मंत्र्यांना वेट अॅड वॉचवर ठेवणार. मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे. या शपथविधीला केंद्रातून भाजप नेते येण्याची शक्यता आहे.


No comments:

Post a Comment