वेध माझा ऑनलाइन।
विधानसभा निवडणुकीची मंगळवारी निवडणूक आयोगाकडून घोषणा करण्यात आली. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून दुपारी 3.30 वाजता दिल्लीत पत्रकार परिषद घेत झारखंड आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. महाराष्ट्रातील निवडणूक पहिल्या टप्प्यात होणार आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल घोषित होतील. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत याबद्दलची मोठी घोषणा केली आहे. विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच महाराष्ट्रात आचारसंहिताही लागू झाली आहे.
सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघात निवडणूक आयोगाकडून आचार संहितेची घोषणा होण्यापूर्वीपासूनच घडामोडींना वेग आला आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत सातारा जिल्ह्यात पहायला मिळणार असली तरी वंचित बहुजन आघाडीकडून देखील जिल्ह्यातील उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे.
निवडणुकीचा कार्यक्रम…
विधानसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज करण्याची तारीख ही 22 ऑक्टोबरपासून सुरु होईल. उमेदवार 29 ऑक्टोबरपर्यंत आपला अर्ज दाखल करु शकणार आहेत. यानंतर 30 ऑक्टोबरला सर्व उमेदवारांच्या अर्जाची छाननी होईल. तर 4 नोव्हेंबर 2024 ला पर्यंत उमेदवार आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊ शकणार आहेत, अशी माहिती निवडणूक आयुक्तांनी दिली आहे. 25 नोव्हेंबरपर्यंत निवडणुकीचा कार्यक्रम पूर्ण होणार आहे
No comments:
Post a Comment