वेध माझा ऑनलाइन।
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांना एसआयटीने नोटीस बजावली आहे. चौकशीस गैरहजर राहिल्यास त्यांना अटक होऊ शकते, असा मोठा दावा राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी केला आहे. चाकणकर यांच्या कार्यपद्धतीवर त्यांनी टीका करत ‘मेंटॉस बाई’ असे म्हटले. खरात प्रकरणात रोज नवीन खुलासे होत असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
भोंदूबाबा अशोककुमार खरात प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. महिलांना जाळ्यात ओढण्याची खरातची मोडस ऑपरेंडी समोर येत आहे. तसेच महिला आयोगाकडे तक्रारी घेऊन येणाऱ्या महिलांना खरातकडे पाठवले जात असल्याचंही समोर येत आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणी खरातच्या शिवनिका ट्रस्टच्या आजीमाजी सदस्यांची चौकशी होणार आहे. यातील एक माजी सदस्या रुपाली चाकणकर यांना एसआयटीने नोटीस बजावली आहे. तरीही त्या चौकशीला हजर झाल्या नाहीत. त्या चौकशीला हजर राहिल्या नाही तर त्यांना अटक होऊ शकते. ही कायद्याची प्रक्रियाच आहे, असा दावा राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी केला आहे. त्यामुळे चाकणकर या एसआयटी चौकशीला स्वत:हून सामोरे जाणार की नाही? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
रुपाली पाटील ठोंबरे यांनी मीडियाशी संवाद साधत असताना हा सर्वात मोठा दावा केला आहे. खरात प्रकरण एसआयटीकडे गेले. आज आठ दिवस झाले. काल रुपाली चाकणकर यांना एसआयटीचं समन्स गेलं होतं. त्यामुळे त्या आता आजाराचं कारण देऊ शकत नाही. एसआयटीने कुठल्या तरी कार्यक्रमाचं निमंत्रण दिलंय या आविर्भावात त्या असतील. पण हे निमंत्रण नाही. एका भयंकर गुन्ह्यासाठीचं समन्स आहे, असं रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या.
No comments:
Post a Comment