Sunday, April 24, 2022

यात्रेकरू भाविकांवर मधमाशांचा हल्ला ; त्यावेळी जीव वाचवण्यासाठी पळताना युवकाचा दरीत पडून मृत्यू ; या घटनेने सातारा तालुक्यातील शिवाजीनगर परिसरात खळबळ...

वेध माझा ऑनलाइन - यात्रेनिमित्त दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांचा हल्ला झाला त्यावेळी जीव वाचवण्यासाठी पळताना तारळे येथील युवकाचा दरीत पडून मृत्यू झाला शिवाजीनगर येथील या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे

सातारा तालुक्यातील शिवाजीनगर गावच्या यात्रेनिमित्त दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाश्यांनी हल्ला केला यावेळी जीव वाचवण्यासाठी पळताना एक युवक दरीमध्ये कोसळण्याची दुर्घटना घडली यामध्ये या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे सोमेश्वर विलास कदम वय 13 राहणार तारळे असे सदर मुलाचे नाव आहे शिवाजीनगर गावच्या यात्रेनिमित्त भाविक दर्शनासाठी डोंगरावर असलेल्या खंडोबा मंदिरात गेले होते यावेळी झाडावरील मधमाश्यांनी हल्ला चढवल्याने एकच तारांबळ उडाली जीव वाचवण्यासाठी भाविक इकडे तिकडे धावू लागले यावेळी धावत असताना मृत्त सोमेश्वर कदम दरीत कोसळला बचावकार्य करून या युवकाला दरीतून बाहेर काढून जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते मात्र त्याचा मृत्यू झाला आहे या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे... या मधमाशांच्या हल्ल्यात मध्ये दहाच्या वर भाविक जखमी झाले आहेत

No comments:

Post a Comment