वेध माझा ऑनलाइन - देशभरातल्या हिंदू बांधवांनी तयार रहावं. जर 3 तारखेला समजलं नाही तर या देशातल्या न्यायव्यवस्था कायदा या पेक्षा भोंगा मोठा वाटत असेल तर तसचं उत्तर द्यावं लागेल' असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा दिला. तसंच, 5 जूनला सर्व सहकाऱ्यांसोबत अयोध्येला जाणार आहे, अशी घोषणा राज ठाकरेंनी केली.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. शनिवारी हनुमान जयंतीच्या निमित्ताने महाआरती झाल्यानंतर आज राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा भोंग्याबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली.
'आम्हाला कुठली ही दंगल नको. देशभरातल्या हिंदू बांधवांनी तयार रहा. जर 3 तारखेला समजलं नाही तर या देशातल्या न्यायव्यवस्था कायदा या पेक्षा भोंगा मोठा वाटत असेल तर तसचं उत्तर द्यावं लागेल, भोंग्याचा मुस्लीमांना सुद्धा त्रास होतोय. देशभरातल्या लोकांना एवढंच सांगणं आहे हा भोंग्याचा विषय धार्मिक नाही सामाजिक आहे, असं राज ठाकरे म्हणाले.
आमची सर्व तयारी सुरू आहे आम्हाला शांतता भंग करायची नाही आहे. प्रार्थनेला विरोध नाही पण जर त्यांना लाऊड स्पीकर वर ऐकवायचं असेल तर आम्ही ही आरत्या भोंग्यावर लाऊ, असा इशाराही राज ठाकरेंनी दिला.
१ मे रोजी महाराष्ट्र दिनी संभाजीनगर येथे जाहीर सभा घेणार आहे. आणि ५ जूनच्या दिवशी अयोध्येला जाणार आहे. 5 तारखेला सहकाऱ्यांना सोबत घेऊन अयोध्येला जाणार आहे, अशी घोषणा राज यांनी केली
No comments:
Post a Comment