वेध माझा ऑनलाइन - स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढण्याचे ठरवले. भाजपला रोखण्यासाठी आमचा हा प्रयत्न आहे मग कराड नगरपरिषदेच्या निवडणुकीत हा प्रयोग करणार का...या प्रश्नाचे उत्तर देताना निवडणुका जाहीर झाल्यानंतर जरूर याचा विचार करू असे सांगत आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडमध्ये नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी होऊ शकते असे संकेत दिले आहेत
ते आज कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते
दरम्यान महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील राज्यपालांवर निशाणा साधत ते मुद्दामहून वारंवार अशी वादग्रस्त वक्तव्य करत आहेत असे सांगितले त्यांना खरे तर हिमाचल प्रदेशला पुन्हा जायचं आहे. राजकारणात सक्रिय व्हायचे आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना जाऊ देत नाहीत, त्यांना तिकडे पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हायचे आहे. त्यामुळे ते महाराष्ट्रातुन हिमाचलला जाण्यासाठी अशी मुद्दामून वक्तव्य करत असल्याची खोचक टीकाही त्यांनी यावेळी केली
दरम्यान, राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या विधानावरही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले भाजपने हा मुद्दा डोक्यावर घेण्यापेक्षा त्यांनी याविषयीची उत्तरे दिली पाहिजेत असेही आमदार चव्हाण म्हणाले
No comments:
Post a Comment