Sunday, November 6, 2022

उद्धव ठाकरे म्हणतात-मध्यावती निवडणुका होतील ; नारायण राणे म्हणतात- यांचं मुख्यमंत्री पद गेलं म्हणून निवडणुका लागतात का?

वेध माझा ऑनलाइन -  शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतेच राज्यामध्ये मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता असल्याचे भाकीत केले. त्यांच्या या भाकितावरून भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “मध्यावधी निवडणुकीसाठी युद्ध किंवा नैसर्गिक आपत्ती आलीय का? कशामुळे मध्यावधी निवडणुका घेणार? उद्धव ठाकरेंनी कारण सांगावं की, या कारणासाठी मध्यावधी निवडणूक होईल. त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं म्हणून मध्यावधी निवडणुका घेतल्या जातात का? असा सवाल राणेंनी ठाकरेंना केला आहे.

नारायण राणेंनी आज माध्यमाशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना वाटत असेल कि निवडणुका होतील तर तसं होत नाही. कारण शिवसैनिकाच्या बैठकीत अभ्यासू किंवा वैचारिक पद्धतीने त्यांनी सूचना दिलेली नाही. घरबसल्या बोलायला काय? त्यांनी घराच्या बाहेर येऊन बोलावं”, असा इशारा राणेंनी ठाकरेंना दिला.

No comments:

Post a Comment