Wednesday, November 16, 2022

निवडणूक आल्याने आता पप्प्या घेणे मिठ्या मारणे असे प्रकार साताऱ्यात सुरू होतील- आ शिवेंद्रसिंहराजे यांची उदयनराजेंवर टीका...

वेध माझा ऑनलाईन - पालिका निवडणुक आली की सातारकरांना आम्ही कशी पालिका चांगली चालवली हे सांगतील आणि पुन्हा निवडून द्या म्हणतील. परंतु सध्याच्या मुलभुत प्रश्नांकडे जाणिवपुर्वक सातारा विकास आघाडी आणि त्यांचे नेते लक्ष देत नसल्याची टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी खासदार उदयनराजे भाेसले यांच्यावर केली.दरम्यान,.. निवडणूक आल्याने आता सातारकरांना मिठ्या मारणे, पप्प्या घेणे असे प्रकार पुन्हा साता-यात सुरु हाेतील अशी टीका देखील यावेळी शिवेंद्रसिंहराजे यांनी उदयनराजेवर केली 

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले माध्यमांशी बाेलत हाेते. ते म्हणाले सातारा पालिकेत सध्या प्रशासक आहे. परंतु सत्तेत असलेली सातारा विकास आघाडी सध्या काेणत्याही मुलभूत प्रश्नांकडे लक्ष देत नाही दरम्यान या टिकेवर आता उदयनराजे भाेसले काय उत्तर देतात हेच पाहायचे आहे.

No comments:

Post a Comment