वेध माझा ऑनलाइन - मध्यावती निवडणुका अजिबात होणार नाहीत शिंदे-फडणवीस सरकार आपला सत्तेचा कार्यकाळ पूर्ण करेल मात्र तो पूर्ण झाल्यानंतर या दोघांच्यात भांडणे होतील असे भाकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले दरम्यान मी सत्ताधारी आणि विरोधक अशा कोणासोबतच नाहीये मी फक्त शेतकऱ्यांबरोबर आहे असेही विधान शेट्टी यांनी यावेळी बोलताना केले दरम्यान एफआरपीत दीडशे रुपये वाढवून दिल्याचे भासविले जात असताना दुसरीकडे रिकव्हरीचा बेस पाव टक्क्याने वाढवून फसवणूक होत असल्याचा आरोप करत ऊसदरासाठी येत्या गुरुवारपासून राज्यभर दोन दिवसीय लाक्षणिक ऊसतोड बंद आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही शेट्टी यांनी यावेळी दिला.
शेट्टी पुढे म्हणाले, राज्यकर्ते आणि साखर कारखानदार संगनमताने ऊस उत्पादकांची लुट करीत आहेत. चालू हंगामात उसाला विनाकपात एकरकमी एफआरपी व हंगाम संपल्यानंतर ३५० रूपये साखर कारखानदारांनी ऊस उत्पादकांना द्यावेत, या प्रमुख मागणीसाठी ‘स्वाभिमानी’कडून आंदोलन पुकारण्यात आले आहे. उसाच्या उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. खते, औषधे, मजुरी वाढली असताना ऊसदर मात्र, त्याप्रमाणात वाढलेला नाही. कृषी मुल्य आयोग एफआरपी ठरवताना या बाबी का लक्षात घेत नाही ते कळत नाही. ऊसापासून तयार करण्यात येणार्या उपपदार्थांचा नफा शेतकर्यांना दिला जात नाही. त्याचा हिशोबही कारखानदार देत नाहीत. त्यामुळे उपपदार्थांचा नफा शेतकर्यांना मिळावा अशी आमची मागणी आहे. एफआरपी ठरविण्याचे सूत्र नव्याने तयार करायला हवे अशी मागणी आम्ही कृषी मुल्य आयोगाकडे केली असता केंद्र सरकारकडे याबाबतची शिफारस करणार असल्याचे कृषी मुल्य आयोगाच्या अध्यक्षांनी सांगितले.चालू हंगामात दीडशे रूपये वाढवून दिल्याचे सांगितले जात असले तरी ही शेतकर्यांची फसवणूकच आहे शेतकर्यांना केवळ ७५ रूपयेच वाढवून मिळणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment