Sunday, September 3, 2023

अजितदादा बोलायला उठले, आणि देवेंद्र फडणवीस निघून गेले...काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाइन। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक निर्णय घेतल्याची चर्चा आहे. अजित पवार यांनी कोणताही निर्णय घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचीही तिथे स्वाक्षरी लागेल, त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अंतिम स्वाक्षरी नंतर तो निर्णय अंमलात येईल, असा नियम शिंदेंनी बनवला. याशिवाय अजित पवार यांनी साखर कारखान्यांबद्दल काढलेला जीआर देवेंद्र फडणवीस यांनी रद्द करत नवा जीआर काढला. कारण त्या जीआरमुळे भाजपचे अनेक नेते अडचणीत आले होते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आजही आहे.या दोन घटनांमुळे महायुतीत एकमेकांवर कुरघोडी केली जात असल्याच्या चर्चांना उधाण आलं. यावर देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच जाहीरपणे भाष्य केलं आहे. महायुतीची मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. “अजित दादा बोलायला उभे राहिले आणि देवेंद्र फडणवीस निघून गेले, अशाप्रकारची बातमी होऊ नये यासाठी मी स्पष्टीकरण देतो. नेवीचे चीफ महाराष्ट्रात आले होते. आपण डिफेन्स मॅनिफॅक्चुरिंगसाठी त्यांची वेळ मागितली होती. नेमकी त्यांची वेळ साडेतीनची आल्यामुळे मी 15 मिनिट त्यांची वेळ घेऊन परत आलो”, असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.

ही फेविकॉलची जोड आहे’
“आताच्या परिस्थितीत आपल्या विरोधकांच्या माध्यमातून एकच गोष्ट चालली आहे. तुम्ही कुणाची मनधरणी करु शकणार नाही तर त्यांना गोंधळात टाका, असा विरोधकांचा प्रयत्न सुरु आहे. एक विसंवाद तयार करण्याचा प्रयत्न, कुठेतरी वाद सुरु आहे, असं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण एक गोष्ट निश्चितपणे आपण समजून घेतली पाहिजे, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमचे सर्व मित्रपक्ष सर्वांची फेविकॉलची जोड आहे ती सहजासहज तुटणार नाही”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आमच्यात पूर्ण संवाद’
“पेपरमध्ये कधीतरी वाचायला मिळतं याने त्याच्यावर कुरघोडी केली, याने त्याच्या संदर्भात असं सांगितलं. तुम्ही त्यांची काळजी करु नका, मुख्यमंत्री, मी आणि अजित दादा आमच्यात पूर्ण संवाद आहे. पूर्ण एका विचाराने आणि एका दिशेने आम्ही चाललो आहोत. सर्व निर्णय एकत्रितपणे घेतोय. शंभर टक्के समन्वय आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आमची परिस्थिती इंडिया आघाडीसारखी नाही. 
या मंचावर आलेल्या कुणालाही प्रश्न पडला नाही की माझी जागा कुठे आहे. समोर बसलेले दिग्गजांनाही वाटलं नाही की आपली जागा कुठे आहे?”, अशी टीका फडणवीसांनी केली.


No comments:

Post a Comment