वेध माझा ऑनलाइन | बीडमध्ये क्षीरसागर यांचे घर जाळले. त्यांचे कुटुंब थोडक्यात वाचले. त्यांचे दु:ख समजून घेण्यासाठी मी त्यांच्या घरी गेलो. तेव्हा क्षीरसागर म्हणाले की कामानिमित्त मी संभाजीनगरला आलो आहे. मात्र मी नंतर बघितले तर रोहित पवार हे संदीप क्षीरसागरांना घेऊन जरांगेंना भेटायला गेले होते... आमचे घर अर्धच का जाळले.. म्हणून जरांगेंची माफी मागण्यासाठी गेला होतात का ? असा बोचरा सवाल विचारत मंत्री छगन भुजबळांनी संदीप क्षीरसागर यांच्यावर निशाणा साधला.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज हिंगोली येथे दुसरा ओबीसी एल्गार मेळावा पार पडला. या मेळाव्यातून छगन भुजबळ यांनी संदीप क्षीरसागर यांच्यावर टीकास्त्र सोडले. तसेच मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांना देखील शेलक्या शब्दांत सुनावले.
मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधताना भुजबळ म्हणाले, मराठा समाजाचे आता एक नवीन नेते तयार झाले आहेत. ते म्हणतात, लायकी नसणाऱ्या लोकांच्या हाताखाली आम्हाला काम करावे लागत आहे. म्हणजे ओबीसी, एससी, एसटींची लायकी नाही का? शिवाजी महाराजांच्या सैन्यात बहुजन समाजातील लोक होते.त्यांची लायकी नव्हती म्हणून त्यांनी शिवरायांना साथ दिली का. अनेक संत वेगवेगळ्या बहुजन जातीतील होऊन गेले.त्यांची लायकी होती की नाही, असा सवाल भुजबळ यांनी केला.
भुजबळ म्हणाले, झुंडशाही खपवून घेणार नाही. मराठा समाजाला किंवा मराठा आरक्षणाला माझा विरोध नाही.मात्र ओबीसींच्या हक्काच्या आरक्षणात मराठ्यांचा समावेश करू नका, ही आमची मागणी आहे.
No comments:
Post a Comment