Wednesday, July 31, 2024

पावसाचा जोर आणखी वाढणार ; सातारा जिल्ह्यला यलो अलर्ट ;

वेध माझा ऑनलाइन।
राज्यभरात गेल्या काही दिवसांत जोरदार पाऊस बरसला आहे. जुलै महिन्यात सरासरीच्या 138 टक्के जास्त पाऊस झाल्याची माहिती  पुणे वेधशाळेने दिली आहे. मुंबई, पुणे, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि विदर्भ येथे पावसाने प्रचंड धुमाकूळ घातला. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.हवामान विभागाने आता येत्या 4 ते 5 दिवसांत पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज दिला आहे. राज्यातील अनेक धरणे 90 टक्के भरले असून पुढील काही दिवस नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.


‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

हवामान विभागान ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.

तसेच पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये 1 ते 3 ऑगस्ट दरम्यान काही ठिकाणी अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
मराठवाड्यात पुढील तीन ते चार दिवस तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मराठवाड्यात दोन ते तीन ऑगस्टला तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे 2 आणि 3 ऑगस्टला येथे यलो अलर्ट देण्यात आला आहे.



No comments:

Post a Comment