पुणे येथे वाई विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची काल महत्वाची बैठक पार पडली. यावेळी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी रोखठोक भूमिका मांडली. वाई विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत तुतारी चिन्हावरच उमेदवार उभा केला जाणार आहे. विद्यमान आ. मकरंद पाटील यांचा विषय आता सोडून देवू. त्यांच्या परतीचे मार्ग बंद केले आहेत, अशी रोखठोक भूमिका राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष खा. शरद पवार यांनी व्यक्त केली.
पुण्यात पार पडलेल्या बैठकीला साताऱ्यातून डॉ. नितीन सावंत, वाई तालुकाध्यक्ष दिलीप बाबर, खंडाळा तालुकाध्यक्ष रमेश धायगुडे, सातारा लोकसभा मतदारसंघाचे युवक अध्यक्ष विजयसिंह पिसाळ, अॅड. निलेश डेरे, नितीन भिलारे, प्रसाद सुर्वे, माजी उपसभापती अनिल जगताप, प्रताप यादव यांच्यासह तिन्ही तालुक्यांतील कार्यकर्ते उपस्थित होते.
या बैठकीत खा. पवार म्हणाले, सातारा जिल्हा हा यशवंत विचारांचा जिल्हा आहे. या विचारांशी फारकत घेणाऱ्यांना जिल्ह्यातील जनता कधीच स्वीकारणार नाही. त्यामुळे आपल्याला सोडून गेलेल्यांचा विषयही सोडून देवूया. एनसीडीसीचा मीही प्रमुख होतो. राज्य शासनाने किसन वीर कारखान्याला थक हमी दिली असली तरी ते सभासदांच्या डोक्यावर एक प्रकारे कर्जच आहे. विधानसभा निवडणुकीत आपण सर्वांनी मिळून पुन्हा पक्ष उभा करु.
No comments:
Post a Comment