वेध माझा ऑनलाइन।
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असून २४ तासांत कोयनेच्या सर्वाधिक २२ मिलीमीटरची नोंद झाली. तर यावर्षी आतापर्यंत सर्वाधिक पर्जन्यमान नवजाला २ हजार ३५६ मिलीमीटर झाले आहे. कोयना धरणात ४३.३९ टीएमसी इतका पाणीसाठा निर्माण झाला आहे.
बुधवारी सायंकाळीपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे फक्त २२ मिलीमीटर पाऊस पडला. तर नवजाला १८ मिलीमीटरची नोंद झाली आहे. एक जूनपासूनचा विचार करता कोयनानगरला आतापर्यंत २ हजार २३ मिलीमीटर तर महाबळेश्वर येथे १ हजार ८१४ मिलीमीटर पाऊस पडला. यंदा महाबळेश्वरच्या पावसाचे प्रमाण कमी आहे. तर कोयना धरणक्षेत्रातही पावसाचा जोर कमी झाला
No comments:
Post a Comment