कराड
दोन दिवसांपूर्वी एका चिमुरड्याचा पालिकेने काढलेल्या खड्यात पडून मृत्यू झाला याला जबाबदार कोण ?याबाबत आता चर्चा सुरू आहेत अनेकजण त्या मुलाच्या कुटुंबियांना भेटले, मदत केली... वगैरे वगैरे...पण पालिकेच्या झालेल्या हलगर्जीपणाबद्दल अजूनही कोणी पुढारी ,का बोलत नाहीत ? फक्त सहानुभूतीच राजकारण सुरू आहे का ? अशी चर्चा आता सुरू झाली आहे... पुन्हा अशी घटना घडणार नाही असे आश्वासन जरी त्या पीडित कुटुंबाला मिळाले असले तरी, त्या कुटुंबाने आम्हाला आश्वासन नको न्याय हवाय असा मचकूर असणारा बोर्ड लावून आपल्या भावनांना वाट करून दिली आहे...आमच्या मुलाची यात काय चूक? असा भावनीक प्रश्नदेखील त्यांनी विचारला आहे...तो फलक वाचून आणि त्या मुलाचा हसरा चेहरा पाहून खरोखरच पालिकेच्या हलगर्जीपणाने एका निष्पाप मुलाचा जीव घेतल्याची चीड आल्याशिवाय राहत नाही..
दोन दिवसापूर्वी बुधवार पेठेतील एक लहान मूल येथील पालिकेने त्याच ठिकाणी काढलेल्या एका खड्यात पडून मरण पावले त्याचे वय अवघे 4 वर्षे होते...सगळा परिसर हळहळत होता...शहरात देखील याबाबत आजही खूपच हळहळ व्यक्त होयेय...त्या ठिकाणी आपला चिमुरडा असता तर ?अशा विचाराने अनेकांचा थरकाप होतोय... नगरपालिकेकडून हलगर्जीपणा झालेली आणि त्यामुळे लोकांचा जीव गेल्याची अनेक उदाहरणे आहेत त्यात आता आणखी भर पडली आहे...मागील वर्षी कचरा डेपोच्या प्रोजेक्टवर काम करताना एक युवक मरण पावला एका जेष्ठ नागरिकांला ड्रेनेज चे काम चालू असताना आपला जीव गमवावा लागला दोन लहान मुले इदगाह मैदान येथे वृक्षारोपण करण्यासाठी काढलेल्या खड्यात पडून मरण पावले या व अशा अनेक घटना घडल्या तरी पालिकेने जबाबदारीने अशा घटनाकडे पाहिलेलं अद्यापतरी दिसलेले नाही...केवळ अशा घटना सहानुभूतीच्या बळी ठरतात.. त्याची चार दिवस प्रसिद्धी होते...नंतर परत जैसे थेंच परिस्थिती असते...त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मानसिकता प्रशासनाची आजतागायत दिसून आलेली नाही.. एकूणच पालिकेच्या सगळ्याच भम्पक कारभराचीही चर्चाही यानिमित्ताने होत असते मग बजेटची झालेली बॉम्ब असू दे पालिकेची बिल न भरल्याने लाईट कट केल्याचा विषय असो , पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याचे वास्तव असो किंवा रस्त्यात खड्डे काढून महिने महिने त्याकडे लक्ष न दिल्याने त्यात गाड्या अडकून नुकसान होण्यासह लहान मूल व नागरिक त्यात पडून मृत्युमुखी पडत असल्याच्या घटना असोत.. लोकसेवक तात्पुरती मलमपट्टी करून आपली जबाबदारी झटकतात असा आजपर्यंतचा अनुभव आहे... मग प्रश्न असा आहे की जसे चांगल्या घडामोडी शहरात घडतात तेव्हा त्या आम्ही केल्या असे सांगून क्रेडिट घेण्यासाठी पालिकेत नगरसेवकांची चढाओढ लागते...तशी चढाओढ अशा घटना आमच्या हलगर्जीपणा मुळे घडल्या... अशी छातीठोकपणे सांगण्यासाठी का लागत नाहीत... ? केवळ सहानुभूती दाखवून काय उपयोग? चार दिवस चर्चा...आणि परत जैसे थें... अशा प्रसंगाने मरण पावलेल्यांचा खरोखरच काय दोष? पालिका प्रशासन असच चुकणार...मग किती लोकांनी असच मरायचं...?हे किती दिवस ढोंग चालणार? याची जबाबदारी कोणी घेणार आहे की नाही? जे मृत होतायत त्यांची ही चूक आहे का ?राजकारण करताना माणुसकीचा विचार होणेही तितकेच गरजेचे नाही का ?
पालिकेत काही कॉन्ट्रॅक्टर लोकांना जपण्याचे थोतांड सुरू असते त्यात अधिकारी पुढे दिसतात त्यांचा आणि नगरसेवकांचा समनवय अजिबातच दिसत नाही आणि या सर्वांचे मुख्य म्हणवणारे अधिकारी या पूर्वीच्या सी ओ डांगेप्रमाणे निष्काळजीपणे काम करणारे आहेत का ? अशीही चर्चा यानिमित्ताने होते आहे कारण त्यांचा बेजबाबदारपणा याच प्रकरणामुळे आता उघडही झाला आहे...आणि हे वास्तव ते स्वतःही मान्य करतील... या घटनेला कॉन्ट्रॅक्टर अधिकारी यांच्याशी समनव्य न राखणारे नगरसेवक पण तितकेच जबाबदार नाहीत का? या घटनेतून शहाणपण घेऊन यापुढे काही ठोस उपाययोजना व्हाव्यात यासाठी प्रयत्न होणार आहेत का ?...अशा अनेक घटना घडल्या आहेत तरी काहीच उपाययोजना अद्यापही झालेल्या नाहीत...यापुढे होतील अशी गॅरंटी नाही... एखादा दुसरी सामाजिक संघटना सोडली तर कोणी या विषयात आवाजही उठवताना दिसत नाही हे दुर्दैव नाही का ? या घटनांचा संवेदनशील मनाने विचार करण्याची आता गरज निर्माण झाली आहे...अशा प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी प्रयत्नांची इच्छाशक्ती हवी आहे...एका आईचा पोटचा गोळा काही दोष नसताना असा अचानक गेला की तो आता परत येणारच नाही... या विचाराने ती माऊली आपल्या चिमुरड्याशिवाय जिवंत राहून देखील उर्वरित मरणप्राय आयुष्य कशी जगेल या विचारानेच मन सुन्न होते... त्या चिमुरड्याचे वय होते खेळायचे बागडायचे... आणि तो मृत्यूपूर्वी काहीकाळ खेळत बागडतच होता ना? मग ती त्याची चूक होती का ? संवेदनशील मनाने अशा सगळ्या प्रश्नाचा विचार व्हायला हवा म्हणजे या घटनेचे गांभीर्य कळेल त्यानंतर अशा घटना कदाचित होणारही नाहीत आणि निष्पाप जीव जाणारही नाहीत...! अशी चर्चा आहे...
No comments:
Post a Comment