वेध माझा ऑनलाइन।
सातारा जिल्ह्यात पावसाने सध्या उघडीप दिली असली तरी अजून काही भागात रिमझिम पावसाच्या सरी कोसळत आहेत. दरम्यान, कोयना धरणात पाण्याची आवक कमी झाली असून धरणाच्या पायथा वीजगृहातील विसर्गही बंद करण्यात आला आहे. तर शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आलेल्या आकडेवारीनुसार कोयना धरणात 88.22 टीएमसी पाणीसाठा झाला आहे .
कोयना धरण भरण्यासाठी अजून १८ टीएमसी पाण्याची गरज आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत काेयनानगर येथे 07 मिलिमीटर पर्जन्यमान झाले. तर नवजा येथे 12 आणि महाबळेश्वरला 35 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
No comments:
Post a Comment