Friday, September 16, 2022

वेदांता प्रकल्प गुजरातलाच का गेला? आ बाळासाहेब पाटील यांचा पत्रकार परिषदेत सवाल

वेध माझा ऑनलाइन - 
सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योग मंत्री उदय सामंत हे तत्कालीन सरकारमध्ये मंत्रिमंडळात होते. वेदांत कंपनीने सर्च रिपोर्टमध्ये महाराष्ट्र राज्याला प्राधान्य दिले होते. मग या दोन महिन्यात अस काय घडल की तो प्रकल्प बाहेर गेला.बाहेर म्हणजे तो गुजरातलाच का गेला? हा प्रकल्प कर्नाटक तामिळनाडू येथे नाही गेला... असा सवाल आज आ. पाटील यांनी येथे उपस्थित केला 

कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत आ. पाटील बोलत होते. 

पुढे ते म्हणाले, वेदांता प्रकल्प महाराष्ट्रातून जाणे हे पूर्ण चुकीचे आहे. महाराष्ट्राची यामुळे फार मोठी हानी झाली आहे. वेदांता प्रकल्प महाराष्ट्र येणार हे नक्की होतं. दोन महिन्यात असे घडले की मोदी साहेबांच्या विचाराचे लोक राज्यात सत्तेत आले आणि त्यांचा ओढा गुजरातकडे आहे हे स्पष्ट झाले त्यामुळे वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्याचा आरोप माजी सहकार मंत्री व राष्ट्रवादीचे आ. बाळासाहेब पाटील यांनी शिंदे- फडणवीस सरकारवर केला आहे.



No comments:

Post a Comment