Thursday, September 29, 2022

रयत कारखान्यात वीज, इथेनॉल प्रकल्प सुरू होणार ; ऍड उदयसिंह पाटील

वेध माझा ऑनलाइन - रयत सहकारी साखर कारखान्यास अथणी व्यवस्थापनाच्या सहकार्याने चालवताना कराड तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी यांचा विश्वास संपादन करण्यात यश आला. या जोरावर पुढील गळीत हंगामा पासून रयत कारखान्यात गाळप क्षमता विस्तारणीकरणा बरोबर वीज, इथेनॉल, आसवणी प्रकल्प सुरू होणार असल्याची माहिती चेअरमन ऍड. उदयसिंह पाटील- उंडाळकर यांनी बोलताना दिली.

शेवाळेवाडी- म्हासोली (ता.कराड) येथील रयत सहकारी साखर कारखान्याची 26 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी व्हा.चेअरमन आप्पासाहेब गरुड, अथणी -रयतचे युनिट हेड रवींद्र देशमुख, कोयना सहकारी दूध संघाचे अध्यक्ष वसंतराव जगदाळे, कराड तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन रंगराव थोरात, कोयना बँकेचे चेअरमन रोहित पाटील, शामराव पतसंस्थेचे चेअरमन बळवंत पाटील, प्रा.धनाजी काटकर, हणमंतराव चव्हाण, सभेस कारखान्याचे संचालक बाजीराव शेवाळे, पी. बी. शिंदे, प्रशांत पाटील, अर्जुन पवार, आनंदराव पाटील, आत्माराम देसाई, शशिकांत साठे, जयवंतराव बोन्द्रे, विजया माने, माजी सभापती प्रदीप पाटील, किसनराव जाधव कारखान्याचे सभासद,अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

ऍड. उदयसिंह पाटील म्हणाले, 
रयत कारखाना उभारणी पाठीमागे संस्थापक काकाचा जो उद्देश होता, तो सफल होताना दिसत आहेत. आज आपल्यात काका नाहीत, मात्र त्याचे विचार जोपासण्याचे काम आम्ही करत आहोत. गेली 50 वर्षे काकांनी सहकार, समाजकारण, राजकारणाला मार्गदर्शन केले. रयत कारखाना सारख्या संस्था उभारल्या अथणी व्यवस्थापनाच्या सहकार्याने येत्या हंगामापासून गाळप क्षमता विस्तारीकरण, वीज प्रकल्प उभारणी होणार आहे. रयत बीओटी तत्वावर इथेनॉल व आसवणी प्रकल्प कार्यन्वित करणेसाठी प्रयत्नशील आहे.




No comments:

Post a Comment