Monday, September 19, 2022

ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये भाजपा, राष्ट्रवादीमध्ये दिसली चुरशीची लढत ; सकाळपासूनचा निष्कर्ष...

वेध माझा ऑनलाइन - राज्यातील ६०८ ग्रामपंचायतींच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. सकाळपासून सुरू ग्रामपंचायत निवडणुकीच्या  मतमोजणीमध्ये भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुरशीची लढत दिसून येत आहे. आतापर्यंतच्या निकालांमध्ये भाजपा पहिल्या क्रमांकावर तर राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आहे. काँग्रेसने तिसरे स्थान पटकावले आहेत. तर शिंदे गटाने चौथ्या स्थानावर मुसंडी मारली आहे. या निकालांमध्ये शिवसेनेचं सर्वाधिक नुकसान झाल्याचं चित्र असून, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पाचव्या क्रमांकावर फेकली गेली आहे. 

एकूण ६०८ ग्रामपंचायतींपैकी ३९८ ग्रामपंचायतींचे निकाल आतापर्यंत हाती आले आहेत. त्यामध्ये भाजपाने ११६ ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने १०४ ग्रामपंचायतींमध्ये बाजी मारली आहे. काँग्रेसने ४५ ग्रामपंचातींमध्ये आपल्या विचयाचा झेंडा रोवला आहे. तर बंडखोर शिंदे गटाने ३९ ग्रामपंचायतींमध्ये बाजी मारली आहे. 
पक्षामध्ये झालेल्या फुटीचा मोठा फटका शिवसेनेला बसलेला दिसत आहे. शिवसेनेला आतापर्यंत केवळ २० ग्रामपंचायतींमध्येच विजय मिळालेला दिसत आहे. तर इतर पक्ष आणि स्थानिक आघाड्यांनी ७४ ठिकाणी विजय मिळवला आहे.
आघाडीवार विचार केल्यास भाजपा आणि शिंदे गटाला आतापर्यंत १५५ ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळाला आहे. तर महाविकास आघाडीने १६९ ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. अद्याप आणखी  ग्रामपंचायतींचे निकाल येणे बाकी आहे. 




 

No comments:

Post a Comment