शहरी व ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला विविध प्रकारचे दाखले, उतारे व शासकीय योजनांच्या लाभासाठी शासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. सर्वसामान्य जनतेची कामे त्यांच्या गावात व विनासायास व्हावीत, यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. बुधवारी कराड येथे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन रणजित पाटील यांनी केले आहे.या कार्यक्रमात एकाच छताखाली जास्तीत जास्त शासकीय योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळवून देण्यात येणार आहे, असे रणजित पाटील यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment