वर्धन ऍग्रो साखर कारखान्याचे चेअरमन धैर्यशील कदम हे कराड उत्तर चे भाजप चे नेते आहेत यापूर्वी त्यांनी उत्तरची विधानसभा निवडणूक लढवत लक्षवेधी मते मिळवली आहेत
मनोज घोरपडे हे देखील कराड उत्तर चे भाजप चे नेते आहेत त्यांनीही विधानसभा निवडणुकीत घेतलेली मते ही देखील भाजप चे वर्चस्व त्याठिकाणी प्रयत्न केल्यास प्रस्थापित होऊ शकते हे दाखवणारी होती मात्र या दोन भाजप नेत्यांच्या परस्परविरोधी उमेदवारीने मत विभागणी चे नुकसान भाजपला कराड उत्तर मध्ये होत असल्याचे लक्षात आल्याने मावळते जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांच्या पुढाकाराने कराड उत्तर चे राजकिय गणित यावेळी भाजप च्या बाजूने परफेक्ट बसवायचं या उद्देशाने धैर्यशील कदम यांची भाजपचे नूतन सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याचे भाजपच्या नेत्यांकडून सांगण्यात आले दरम्यान सातारा जिल्ह्यात या निवडीमुळे भाजप पक्ष आणखी मजबूत होईल असा विश्वासही सातारा जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी व्यक्त केला आहे
दरम्यान काही दिवसांपूर्वी कराडच्या न पा शाळा नंम्बर 3 मध्ये एका कार्यक्रमासाठी आले असता पत्रकारांशी बोलताना आ जयकुमार गोरे म्हणाले होते यावेळी होणाऱ्या कराड उत्तर च्या निवडणुकीत तुम्हाला भाजप चा एकच उमेदवार उभा दिसेल आणि तोच त्या मतदार संघाचा आमदार असेल असे ते म्हणाले होते त्यामुळे धैर्यशील कदम यांना जिल्हाध्यक्ष करण्यामागे कराड उत्तरच्या राजकारणालाच जिल्ह्यात यापुढे टार्गेट केलं जाणार हेच आता यातून क्लिअर दिसतंय...! पाहूया पुढे काय होतंय ते...
No comments:
Post a Comment