वेध माझा ऑनलाईन। कराड उत्तर विभाग हा कायमच काँग्रेस विचारांच्या पाठीशी राहिला आहे. काँग्रेसची विचारधारा जपणाऱ्या या मतदारसंघात प्रत्येक जिल्हा परिषद गटात काँग्रेसचे संघटन वाढवून ताकद वाढविण्यावर भर देणार असल्याचे मत सातारा जिल्ह्याचे प्रभारी श्रीरंग चव्हाण यांनी यावेळी केले. सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रत्येक विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे संघटन वाढावे तसेच प्रत्यक्ष भेटीतून संवाद वाढविण्यावर भर द्यावा या माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या सूचनेनुसार जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, जिल्ह्याचे प्रभारी श्रीरंगनाना चव्हाण, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अल्पनाताई यादव, जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई, कराड उत्तर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष निवास थोरात तसेच सर्जेराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कराड उत्तर ब्लॉक चा दौरा करण्यात आला. यावेळी कोपर्डे हवेली, मसूर, उंब्रज, पाल, सैदापूर आदी जिल्हा परिषद गटामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या सोबत संवाद दौरा संपन्न झाला.
यावेळी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव म्हणाले कि, काँग्रेस पक्ष हा विचारांचा पक्ष आहे. या पक्षाने आजपर्यंतच्या निवडणूका या विचारांनी लढल्या आहेत, आणि तीच शिकवण काँग्रेस कार्यकर्त्यांना मिळत गेली आहे. सत्ता असो किंवा नसो काँग्रेसचा विचार जपणारे करोडो लोक आजही काँग्रेसच्या पाठीशी ठाम आहेत.
यावेळी कराड उत्तर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष निवास थोरात म्हणाले कि, आपले नेते आदरणीय पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांनी काँग्रेसचे संघटन राज्यात तर केलेच पण जिल्ह्यात सुद्धा केले पण त्या त्या वेळच्या नेत्यांनी काँग्रेस पक्ष वाढीसाठी प्रयत्न न करता स्वतःच्या विकासावर अधिक भर दिल्याने जिल्ह्यात काँग्रेस मागे पडली पण आता स्वतः पृथ्वीराज बाबा जिल्ह्यातील काँग्रेस पुन्हा एकदा उभा करायला सरसावले आहेत आणि त्यांना आमच्यासारखे एकनिष्ठ कार्यकर्ते साथ दिल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेतून संपूर्ण देश जोडला असल्याने सर्वसामान्य जनता काँग्रेसशी जोडली आहे. काँग्रेसचं सामान्य नागरिकांचा विचार करते व त्यांच्या भाल्याचे निर्णय घेते म्हणूनच आपला भारत देश उभा राहिला विकसित झाला.
या दौऱ्यादरम्यान बूथ कमिटी, मंडल कमिटी तयार करून ज्या जबाबदाऱ्या पक्षाकडून दिल्या जातील त्या नियोजनानुसार सर्वानी काम केले पाहिजे असा संदेश या दौऱ्यातून दिला गेला.
No comments:
Post a Comment