Thursday, January 27, 2022

पुढील 4 ते 5 दिवस थंडीचा जोर कायम राहणार ; हवामान खात्याने व्यक्त केला अंदाज

वेध माझा ऑनलाइन - सततचे हवामानातील बदल काही थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. गेल्या काही दिवसांपासून देशात काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे तर काही ठिकाणी कडाक्याची थंडी पाहायला मिळते. खरंतर, आणखी काही दिवस हवामानात असेल बदल होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. भारताचा बहुतांश भाग सध्या थंडीने गारठला आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा खाली घसरत आहे त्यामुळे हवामान खात्याने थंडीचा जोर पुढील 4 तेे 5 दिवस कायम राहील असा अंदाज व्यक्त केला आहे

भारतीय हवामानशास्त्र विभाग  नुसार, पुढील २ दिवसांत विदर्भ, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि गुजरात राज्यात काही ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. मुंबईसह महाराष्ट्राच्या विविध भागांत आताच पारा घसरून हूडहुडी भरू लागली आहे. मंद वाऱ्यांमुळे थंडी असह्य झाली आहे. अशावेळी हवामान विभागाने दिलेला ताजा अलर्ट महाराष्ट्राच्याही काळजीत भर टाकणारा ठरला आहे

No comments:

Post a Comment