Friday, June 30, 2023

कराडच्या पाणी प्रश्नी "आपले कराड' ग्रुपचा फॉलोअप ठरला महत्वाचा ; कराड शहरात जुन्या दराने होणार पाणीपट्टी आकारणी ; "आपले कराड' ची होती मागणी ;

वेध माझा ऑनलाईन। संजय चव्हाण त्यांनी आपले कराड या कराडमधील सामाजिक  ग्रुपच्या माध्यमातून प्रशासनाला कराडच्या सुरू होणाऱ्या 24 तास पाणी प्रश्नी व पाणीबिला संदर्भात दर कमी करण्याबाबत व जुन्या पद्धतीने या बिलाची दर आकारणी करण्यासाठीचे पत्र दिले होते याप्रश्नी त्यांनी उपोषणाचा इशाराही दिला होता दरम्यान जुन्या दराने कराडच्या पाणीपट्टी बिलाची आकारणी होणार हे आता निश्चित झाले आहे तसे आदेश साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत त्यामुळे आजच्या प्रशासनाच्या निर्णयाला आपले कराड ग्रुप ने घेतलेला फॉलोअप देखील महत्वाचा ठरला आहे

काही महिन्यांपूर्वी कराडचा पाणीप्रश्न चांगलाच पेटला होता 24 तास पाणी शहराला देणार या चर्चेने अनेक वर्षे रखडलेली शहराची 24 तास पाणीपुरवठा स्कीम सपशेल फेल गेली असताना देखील दुसरीकडे त्याच्या नावाखाली बसवलेल्या फौल्टी मीटर बाबत गावातून तक्रारी येऊन हा विषय चिघळला होता... शहराला 24 तास पाणी मिळायचं राहीलं बाजूला पण त्या मीटर मधून येणाऱ्या हवेमुळे भरमसाठ बिल येतंय अशा तक्रारी गावात वाढल्या होत्या...तर काही ठिकाणी 9 -9महिने बिलच आले नाही अशी या पाणीपट्टी बिलाची बोंब उठली होती... आणि त्यामुळेच खऱ्या अर्थाने शहरातील पाणी पेटल्याची स्थिती गावात निर्माण झाली होती 
दरम्यान, आज सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी कराडच्या पाणी प्रश्नावर पूर्वीच्याच पद्धतीने पाणीपट्टी आकारणी करण्याबाबतचे आदेश जारी केले आहेत  

शहरातील अनेक राजकीय नेत्यांसह काही सामाजिक कार्यकर्तेही या प्रश्नी पुढे झाले होते आपले कराड या सामाजिक ग्रुपने देखील घेतलेला यासाठीचा फॉलोअप देखील महत्वपूर्ण ठरला आहे या ग्रुपच्या माध्यमातून कराड शहराच्या या पाणीप्रश्नी उपोषणाचा इशाराही देण्यात आला होता

कराडच्या पाणी प्रश्नी "आपले कराड' ग्रुपचा फॉलोअप ठरला महत्वाचा ; कराड शहरात जुन्या दराने होणार पाणीपट्टी आकारणी ; "आपले कराड' ची होती मागणी ;

वेध माझा ऑनलाइन। सामाजिक कार्यकर्ते संजय चव्हाण यांनी "आपले कराड' हा कराड शहर व परिसरात सामाजिक कार्य करणारा अग्रेसर व्हाट्स अप ग्रुप तयार केला आहे या ग्रुपमध्ये सामाजिक कार्याची जाण आणि भान असणारे जागृत लोक सामील आहेत या ग्रुपच्या माध्यमातून शहर व परिसरातील अनेक प्रश्न आजपर्यंत सुटले आहेत केवळ काही महिन्यांपूर्वी फॉर्म झालेला हा ग्रुप अल्पावधीतच कराडकरांसाठी आता जणू गरजेचा बनला आहे 

आज सायंकाळच्या दरम्यान येथील घाटावरील स्वछतागृहमध्ये स्वछता नसते असा मेसेज या ग्रुपवर एका सुज्ञ नागरिकाने फोटोसाहित  टाकला त्याचवेळी... कळवले आहे... असा मेसेज एडमीन चव्हाण यांनी ग्रुपवर टाकला... आणि मोजून तासाभराच्या अंतराने त्या स्वछतागृहमध्ये असणारी सर्व घाण स्वच्छ करून त्यामधील चोक-अप काढले गेल्याचे नगरपालिका मुकादम श्री मारुती काटरे व त्यांच्या सर्व टीमने लग्गेच कळविले... एडमिन चव्हाण यांनी त्यांचे आभारही मानले...

थोडक्यात , कोणतेही काम असो... इतक्या पटकन लोकांच्या कोणत्याही तक्रारीला या ग्रुपच्या माध्यमातून रिझल्ट आता मिळू लागला आहे... हे या ग्रुपचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल... वीज पाणी रस्ते यासह शहर व परिसरातील कोणतेही आणि कसलेही सामाजिक प्रश्न सुटण्यासाठी शहरातील लोकांसाठी "मसीहा' म्हणून काम करणारा हा सामाजिक ग्रुप बनला आहे... अशी नागरिकांची भावना आहे...या ग्रुपच्या मार्फत असे अनेक प्रश्न यापूर्वी सुटले आहेत यापुढे देखील नक्कीच सुटतील...आणि कराडकर नागरिकांना याची खात्रीही आहे... यामुळेच  आपले कराड ग्रुपचे सर्वत्र कौतूक होताना दिसत आहे...

कराडातील काँग्रेस,राष्ट्रवादी , मनसे, शिंदे गट व नेते राजेंद्रसिंह यादव तसेच इंद्रजित गुजर, प्रमोद पाटील या सर्वांच्या प्रयत्नांना आले यश ; कराडात जुन्या पद्धतीनेच होणार पाणीपट्टी आकारणी ;

वेध माझा ऑनलाईन। कराड पालिकेने शहराची पाणीपट्टी पहिल्या दरानेच घेण्याबाबत सातारा जिल्हाधिकारी यांचे आदेश आहेत अशाच पद्धतीने पाणीपट्टी आकारणी व्हावी अशी समस्त कराडकरांची इच्छाही होती यापद्धतीने आकारणी होण्याबाबत कराडातील नगरसेवक राजेंद्रसिंह यादव इंद्रजित गुजर तसेच काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाने देखील मागणी केली होती शहरातील मनसे व  शिंदे गटाचे राजेंद्र माने तसेच दक्ष कराडकरचे प्रमोद पाटील यांनी हीच मागणी लावून धरत कराडकरांना वेठीस धरू नका असेही म्हटले होते आता या सर्वांच्या मागणीला यश आल्याचे दिसत आहे सातारा जिल्हाधिकारी यांनी कराडच्या या पाणी प्रश्नावर पूर्वीच्याच पद्धतीने पाणीपट्टी आकारणी करण्याबाबतचे आदेश दिले आहेत

दरम्यान, याबाबत येणाऱ्या पाणीपट्टी बिलात कराडच्या जनतेसाठी शहरातील राष्ट्रवादीने 15 टक्के कपात द्या अशी मागणी केली होती...  कॉंग्रेसने 25 टक्के कपातिची मागणी केली होती तर राजेंद्रसिंह यादव यांनी 50 टक्के कपात करा... अशी मागणी केली होती... पाणी बिलात कपात करा नाहीतर पूर्वीप्रमाणेच पाणीपट्टी बिलाची आकारणी करा अशी दुसरीही मागणी त्याचवेळी या सर्वांनीच केली होती...  इंद्रजीत गुजर यांनी देखील पूर्वीच्याच दरात पाणीपट्टीची मागणी केली होती...शहरातील शिंदे गट, मनसे तसेच दक्ष कराडकर प्रमोद पाटील यांनाही हीच मागणी लावून धरली होती... दरम्यान आज जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशामुळे या सर्वांच्या मागणीला यश आल्याची चर्चा कराडात सुरू आहे

काही महिन्यांपूर्वी कराडचा पाणीप्रश्न चांगलाच पेटला होता 24 तास पाणी शहराला देणार या चर्चेने अनेक वर्षे रखडलेली शहराची 24 तास पाणीपुरवठा स्कीम सपशेल फेल गेली असताना देखील दुसरीकडे त्याच्या नावाखाली बसवलेल्या फौल्टी मीटर बाबत गावातून तक्रारी येऊन हा विषय चिघळला होता... शहराला 24 तास पाणी मिळायचं राहीलं बाजूला पण त्या मीटर मधून येणाऱ्या हवेमुळे भरमसाठ बिल येतंय अशा तक्रारी गावात वाढल्या होत्या...तर काही ठिकाणी 9 -9महिने बिलच आले नाही अशी या पाणीपट्टी बिलाची बोंब उठली होती... आणि त्यामुळेच खऱ्या अर्थाने शहरातील पाणी पेटल्याची स्थिती गावात निर्माण झाली होती 
दरम्यान, आज सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी कराडच्या पाणी प्रश्नावर पूर्वीच्याच पद्धतीने पाणीपट्टी आकारणी करण्याबाबतचे आदेश जारी केले आहेत  त्यामुळे याबाबत शहरातील काँग्रेस, राष्ट्रवादी, शिंदे गट,मनसे, राजेंद्रसिंह यादव गट सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पाटील, इंद्रजित गुजर या सर्वांच्या मागणीला एकप्रकारे यश आल्याची भावना कराडकरांमध्ये आहे









अतुल भोसले यांच्या प्रयत्नांमुळे कराडच्या पाणीपट्टी वाढीला स्थगिती ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती मागणी; शहर अध्यक्ष एकनाथ बागडी यांची पत्रकाद्वारे माहिती ;

वेध माझा ऑनलाइन। कराड नगरपालिकेने पाणीपट्टी आकारणीमध्ये केलेली वाढ रद्द करावी, याबाबत भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नुकतीच मागणी केली होती. या मागणीची दखल घेत उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने वाढीव पाणीपट्टीला स्थगिती देण्याचा आदेश नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना बजाविला आहे. डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नांमुळे कराडमधील नागरिकांची वाढीव पाणीपट्टीतून मुक्तता झाली आहे, अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिले आहे. 

याबाबत प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात बागडी यांनी पुढे म्हटले आहे, की गेल्या आठवड्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कराड दक्षिण मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी कराड दक्षिणमधील विविध गावांसह कराड शहराच्या प्रश्नांबाबत आढावा घेतला होता. यावेळी डॉ. अतुल भोसले यांनी कराड नगरपालिकेच्या वाढीव पाणीपट्टीचा मुद्दा प्रकर्षाने मांडला होता. कराड नगरपालिकेने पाणीपट्टी दरात वाढ केल्याने त्याचा नाहक भुर्दंड कराड शहरात राहणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागणार आहे. त्यामुळे ही वाढीव पाणीपट्टी रद्द करावी, अशी मागणी त्यांनी उपमुख्यमंत्री ना. फडणवीस यांच्याकडे केली होती. 

या मागणीची दखल घेत उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने याबाबतचा निर्णय घेण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले. त्यानुसार जिल्हा प्रशासन अधिकारी अभिजीत बापट यांनी नगरपालिकेने पाणीपट्टीतील आकारणीमध्ये केलेल्या वाढीला स्थगिती द्यावी व जुन्या दरानेच पाणीपट्टी आकारावी, असा आदेश बजाविला आहे. याबाबतचे पत्र श्री. बापट यांनी आज कराड पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना पाठविले आहे. 

डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नांमुळे आणि उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच याकामी नूतन मुख्याधिकारी शंकर खंदारे यांचेही विशेष सहकार्य लाभले. याबद्दल भाजपा कराड शहरच्यावतीने डॉ. भोसले, ना. फडणवीस व श्री. खंदारे यांचे सर्व शहरवासीयांच्यावतीने आम्ही आभार मानत आहोत, असे श्री. बागडी व माजी नगरसेवक सुहास जगताप यांनी पत्रकात म्हटले आहे.

जुन्या दरानेच पाणीपट्टी आकारणी करा ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ;

वेध माझा ऑनलाइन। कराड पालिकेने जुन्या दराने पाणीपट्टी आकारणीची कारवाई सुरू करून त्यापूर्वीची थकबाकी असलेली रक्कम 3 कोटी 88 लाख वसूल करावी असे आदेश सातारा जिल्हाधिकारी यांनी नुकतेच दिले आहेत

आदेशात म्हटलं आहे कराड च्या नागरिकानी पाणीपट्टी दरवाढीचा केलेला विरोधाचा विचार करून  दरवाढीस तात्पुरती स्थगिती देण्यात आली असून जुन्या दराने वसुलीस स्थगिती दिलेली नाही असे आदेशात म्हटले आहे

Thursday, June 29, 2023

उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता : अलिबागमध्ये असलेल्या 19 बेकायदा बंगल्या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांचे सूचक विधान ;

वेध माझा ऑनलाईन। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अलिबागमध्ये असलेल्या 19 बेकायदा बंगल्या प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी रश्मी ठाकरे यांच्या नावावर अलिबागमध्ये 19 बंगले असल्याचा आरोप केला होता. यासदंर्भात एका मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना त्यांनी सूचक इशारा दिला आहे.

मुलाखती दरम्यान देवेंद्र फडणवीस म्हणाले, मालमत्ता रश्मी ठाकरे यांच्या नावावर आहे. चौकशी सुरु आहे. यामध्ये गुन्हा दाखल झाला असून लवकरच आरोपपत्र दाखल होईल असे फडणवीस यांनी सांगितले. त्याचवेळी त्यांना रश्मी ठाकरे यांची चौकशी  का होत नाही असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, आवश्यकता नाही. तसेच चौकशी कुणाची करावी आणि कुणाची नाही हे सरकार ठरवत नाही तर पोलीस ठरवत असतात. कोणाची चौकशी करायची हे पोलिसांना ठरवायचे आहे.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, सरकार यामध्ये हस्तक्षेप करत नाही जसे उद्धव ठाकरे करत होते. जर आम्ही यामध्ये हस्तक्षेप केला तर सिस्टीम नीट चालणार नाही. ज्याची चौकशी करायची आहे ती पोलीस करतील. मी एवढेच सांगेन की कोणतेही प्रकरण असो, आम्ही त्यावर कारवाई करु, कोणालाही सोडणार नाही. कोणी चुकीचे केले असेल तर कारवाई होणार, असा सूचक इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

साताऱ्यात भिडे गुरुजींच्या वक्तव्याचा निषेध ; आठवले गटाने जाळले प्रतिकात्मक धोतर ; गुन्हा दाखल करण्याची केली मागणी ;

वेध माझा ऑनलाइन।  भिडे गुरुजी यांनी राष्ट्रगीताबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून यांच्या प्रतिकात्मक धोतराचे साताऱ्यात दहन करण्यात आले रिप्लब्लिकन पार्टी च्या आठवले गटाने अशा पद्धतीने निषेध केला आहे

जन गण मन हे राष्ट्रगीत होऊ शकत नाही. कारण रवींद्रनाथ टागोर यांनी ते 1898 ला इंग्लंडच्या राजाच्या स्वागतासाठी लिहले होते. 15 ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्य दिवस नाही.  या दिवशी भारताची फाळणी झाली भिडे गुरुजी यांनी एका कार्यक्रमात असे विधान केले होते आणि ते वादग्रस्त ठरल्याने अनेक ठिकाणी याबाबत आंदोलने होत आहेत साताऱ्यात देखील याविषयीचा निषेध करण्यात आला रिपब्लिकन पार्टी च्या आठवले गटाने गुरुजींच्या प्रतिकात्मक धोतराचे दहन केले पोवई नाका येथे हा निषेध करण्यात आला व गुरुजींवर गुन्हा नोंद करण्याबाबत मागणी करण्यात आली

Wednesday, June 28, 2023

मंत्रिमंडळ बैठकीतील १४ महत्वाचे निर्णय, वाचा एका क्लिकवर...

महात्मा फुले जनआरोग्य योजना आता पिवळ्या आणि केशरी रेशनकार्ड धारकांसाठीच लागू राहणार नाही तर राज्यातील सर्व साडे बारा कोटी लोकांना मिळणार आहे. राज्यातील कोणीही आरोग्य सेवेपासून वंचित राहणार नाही, यासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आल्याचे शिंदे म्हणाले. 

मंत्रिमंडळ बैठकीनंतर शिंदे यांनी याची माहिती दिली. महात्मा ज्योतिबा फुले योजनेंतर्गत आतापर्यंत जनतेला दीड लाख रुपयांचा आरोग्य विमा दिला जात होता. त्याची मर्यादा पाच लाखांवर करण्यात आली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात दोन कोटी कार्ड वाटली जाणार आहेत, असे शिंदे म्हणाले. 
याचबरोबर राज्यातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी राज्यात 700 ठिकाणी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु करण्यात येणार आहेत. यासाठी 210 कोटींच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे. तसेच राज्यभरात ९ सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता देण्यात आली आहे. 


प्रियांका प्ले हाऊस बंद होणार ! कराड नगरपालिकेचे आदेश ३० दिवसांची मुदत;

वेध माझा ऑनलाइन।  कोयना कॉलनीतील तक्रारदार आंदोलकांच्या बेमुदत आंदोलनाच्या १७व्या दिवशी कराड नगरपालिका ऍक्शन मोडवर आली आहे. प्रियांका प्ले हाऊस चालकांना ३०दिवसात प्ले हाऊस बंद करून स्थलांतरित करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, कोयना कॉलनीतील कोयना गृहनिर्माण संस्थेच्या सभासदांच्या बेमुदत आंदोलनाच्या १७ व्या दिवशी  भर पावसात बेमुदत धरणे आंदोलन सुरुच आहे.

 प्रियांका प्ले हाऊस चालक ठक्कर यांना कराड नगरपालिकेने काढलेल्या आदेशात म्हंटले आहे की, कोयना सहकारी दूध पुरवठा सेवकांची सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, कराड यांचा ठराव क्र. ७ (४) दि. २० ऑक्टोबर २०२२च्या ठरावामध्ये नमुद असल्याप्रमाणे दि. १ मे २०२३ पासून सदर प्लॉटवर प्रियंकाले हाऊस यासाठी नवीन शैक्षणिक प्रवेश घेवू नये व नवीन शैक्षणिक वर्ष सदर ठिकाणी सुरु करणेत येऊ नये असा ठराव करणेत आलेला आहे. परंतु, आपण अद्यापही ठरावाचे पालन करून प्रियांका प्ले हाऊस बंद केल्याचे दिसून येत नाही. गृह निर्माण संस्थेची परवानगी नसताना आपण प्रियांका प्ले हाऊस सुरू ठेवल्याचे दिसून येते.

तसेच आपण प्लॉट क्र. ६०० ब/२२ मधील मिळकती मध्ये प्ले हाऊस सुरू करण्याकरिता नगरपालिकेची परवानगी / ना-हरकत प्रमाणपत्र घेतलेले नाही. आपण मिळकतीचा वापर विनापरवाना करत आहात. तरी आपल्याला या नोटीसद्वारे कळविण्यात येते की, आपण प्रियांका प्ले हाऊस ३० दिवसांच्या आत बंद करावे.

 कोयना सहकारी दूध पुरवठा संघाचे सेवकांची सहकारी, गृह संस्था मर्यादित, कराड व कराड नगरपरिषद, कराड यांच्याकडून आवश्यक असलेल्या परवानग्या घेऊनच प्रियंका प्ले हाऊस सुरु करावे. अन्यथा आपल्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल,असा आदेश कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी खंदारे यांनी काढला आहे.
पालिकेने हटवले प्ले हाऊसचे बोर्ड
एवढे वर्ष कोणत्याही सक्षम प्राधिकरणाच्या परवानगी अथवा ना हरकत दाखल्याशिवाय कोयना कॉलनीमध्ये सुरु असलेले बेकायदेशीर प्रियांका प्ले हाऊस बंद करण्याचे आदेश कराड नगरपालिकेने पारित केले आहेत. आज दि. २८ रोजी प्रियांका प्लेअरचे सर्व फलक पालिका कर्मचाऱ्यानी हटवले.

बेमुदत आंदोलन सुरूच ठेवणार...
गेली १७ दिवसापासून आमचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. आज पालिकेने आमच्या आंदोलनाची दखल घेऊन प्रियांका प्ले हाऊस बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट करत ते बंद करण्याचे आदेश चालकांना दिले असल्याचे समजते.आम्हाला याबाबतचा कोणताही पत्रव्यवहार झालेला नाही, असे असलेतरी सुद्धा जोपर्यंत प्ले हाऊस बंद होऊन स्थलांतरित होत नाही, तोपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन सुरूच ठेवणार आहोत असे आंदोलकर्ते म्हणाले

Tuesday, June 27, 2023

बॅनर वर पांडुरंगाचा फोटो, आणि दुसरीकडे मटणावर ताव ; तेलंगणाचे मुख्यमंत्री वादात अडकणार !

वेध माझा ऑनलाइन। तेलंगाणा चे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे उद्या पंढरपूरात विठ्ठल दर्शनासाठी पोचतायत दरम्यान आज त्यांनी  उमरगा या ठिकाणी मटणवर ताव मारला त्यांच्या या कृतीमुळे ते वादात अडकण्याची शक्यता आहे दरम्यान राष्ट्रवादी चे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट वरून केसीआर यांच्यावर टीका केली आहे

तेलंगाणा चे मुख्यमंत्री केसीआर हे विठ्ठलाच्या दर्शनाला महाराष्ट्रात आले आहेत 600 गाड्यांचा ताफा घेऊन ते मंत्रिमंडळासहित आले आहेत ते उद्या पंढरपूर येथे जाणार आहेत दरम्यान उमरगा येथे आज त्यांनी आपल्या काही लोकांबरोबर मटनावर ताव मारला त्यामुळे ते चर्चेत आले आहेत खरंतर वारीला जाताना, माऊलीचे दर्शनासाठी जाताना त्याठिकाणी नॉन व्हेज खाऊन जाऊ नये अशी प्रथा आहे यावरून राष्ट्रवादी चे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांच्यावर टीका करताना पंढरीची वारी पवित्र आहे ती अपवित्र करू नका असा टोला ट्विट करत लगावला आहे पैशाच्या जोरावर तेलंगाणा चे मुख्यमंत्री मटणाचे बेत करत आहेत असेही त्यांनी म्हटले आहे

संभाजी भिडेंचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य, 15 ऑगस्ट हा काळा दिवस म्हणत राष्ट्रगीत, राष्ट्रध्वजावरही आक्षेप...फडणवीसांनी काय दिली प्रतिक्रिया ?

 वेध माझा ऑनलाइन। नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारे शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. 15 ऑगस्ट हा काळा दिवस म्हणत राष्ट्रगीत, राष्ट्रध्वजावरही भाष्य केले. 15 ऑगस्ट खरा स्वातंत्र्य दिवस नाही, या दिवशी फाळणी झाली होती, असे संभाजी भिडे म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावरुन पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

पुण्यातील दिघी येथे रविवारी संभाजी भिडेंच्या जाहीर व्याख्यान होते. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेने आयोजन केले होते. यामध्ये बोलताना संभाजी भिडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलेय. जन गण मन हे राष्ट्रगीत होऊ शकत नाही. कारण रवींद्रनाथ टागोर यांनी ते 1898 ला इंग्लंडच्या राजाच्या स्वागतासाठी लिहले होते. 15 ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्य दिवस नाही.  या दिवशी भारताची फाळणी झाली.  या दिवशी सर्वांनी उपवास कारावा आणि दुखवटा पाळावा. भारताचा राष्ट्रध्वज जोपर्यंत भगवा म्हणून स्विकारला जात नाही, तोपर्यंत शांत बसायंच नाही.  आपली स्वातंत्र्य देवता जोधाबाई सारखी मुसलमानांच्या जनानखान्यातील बटीक नसेल तर ती सीतेसारखी पतिव्रता असेल, असे भिडे म्हणाले.

संभाजी भिडेंचा राष्ट्रगीतावर आक्षेप का?

रवींद्रनाथ टागोरांनी 1911 मध्ये केली 'जन गण मन'ची रचना

टागोरांनी रचलेल्या गीतात पाच कडवी, राष्ट्रगीत म्हणून एकच कडवं स्वीकारलं

जन गण मन 1911 मध्ये भारतात भरलेल्या दिल्ली दरबारसाठी रचल्याचा आरोप

हे गीत दिल्लीत भरलेल्या दरबारात ब्रिटन सम्राट जॉर्ज पंचमला 

भारत सम्राट जाहीर केलं जातं होतं त्यासाठी रचलेल्याचा आरोप

टागोरांनी मात्र एका पत्रातून तेव्हा हे सर्व आरोप नाकारलेले आहेत. 

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ?
भारताला राजकीय स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 लाच मिळालेले आहे. आपल्या सगळ्यांच्या मनात हे शल्य आहे, भारताची फाळणी झाली, विभागणी झाली. आपल्याला अखंड भारत पाहायचा आहे. अखंड भारत होईल, तेव्हाच समाधान होणार आहे. पण याचा अर्थ 15 ऑगस्ट 1947 भारताचा स्वातंत्र्य दिवस नाही, हे त्या अर्थाने कुणी म्हणत असेल तर योग्य नाही. तोच आपला स्वातंत्र दिवस आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

 

कृष्णा हॉस्पिटलची आरोग्य दिंडी पंढरीच्या दारी ; २५ जणांच्या पथकाने वारकऱ्यांना दिली आरोग्य सेवा; ३० वर्षे अव्याहतपणे उपक्रम

वेध माझा ऑनलाईन।  महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून निघालेल्या शेकडो दिंड्या पंढरपूरजवळ पोहचल्या आहेत. कराड तालुक्यातील अनेक दिंड्याही पंढरपूरसमीप पोहचल्या असून, परिसरातील अनेक वारकरी बंधू-भगिनी मोठ्या संख्येने या दिंड्यांमध्ये सामील झाले आहेत. या वारकऱ्यांना कृष्णा हॉस्पिटलच्या पथकाने वारी मार्गावर वैद्यकीय सेवा देत, त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली. 

कराडसह वाळवा तालुक्यातील वारकरी श्री मच्छिंद्रनाथ महाराज दिंडी सोहळा (किल्ले मच्छिंद्रगड), श्री संत गाडगेबाबा दिंडी सोहळा (तांबवे), श्री बापू नाना कृष्णत नाना दिंडी सोहळा (तांबवे), श्री मुकुंद महाराज दिंडी सोहळा (आटके) आदी दिंड्यांमधून मोठ्या संख्येने पंढरपूरला जातात. यामध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कृष्णा हॉस्पिटलच्यावतीने दरवर्षी वारीच्या कालावधीत आरोग्य सेवा दिली जाते. सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पा) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झालेला हा आरोग्य सेवेचा उपक्रम गेली ३० वर्षे अव्याहतपणे सुरु आहे. 

कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले व कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाही कृष्णा हॉस्पिटलच्या २५ जणांच्या वैद्यकीय पथकाने वारी मार्गावर ठिकठिकाणी आरोग्य सेवा दिली. या पथकात मेडिसीन, सर्जरी, ऑर्थोपेडिक, त्वचारोग, स्त्री रोग, दंतविकार, नेत्ररोग, फिजीओथेरपी, कान-नाक-घसा तज्ज्ञांचा समावेश होता. पळशी, माणगंगा कारखाना (आटपाडी), झरे व सुपली याठिकाणी आरोग्य तपासणी व सर्वरोग निदान शिबीराचे आयोजन करुन, वारकऱ्यांना आरोग्य सेवा देण्यात आली. यावेळी वारकऱ्यांना मोफत तपासणी व उपचारासह आवश्यक औषधेही मोफत पुरविण्यात आली.


Monday, June 26, 2023

विंग येथील नवविवाहिता आत्महत्या प्रकरणी सासू राणी माने, नवरा अनिकेत मानेवर गुन्हा दाखल ;

वेफह माझा ऑनलाईन। विंग येथील नवविवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासूवर कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे घरून 4 लाख रुपये घेऊन ये असा तगादा लावुन तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्यामुळेच नीलमने आत्महत्या केल्याची तक्रार मीना अरुण कांबळे यांनी पोलिसांत दिली आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बीड येथील नीलम यांचा विवाह विंग येथील अनिकेत माने यांच्याशी नऊ मार्च 2023 रोजी झाला होता विवाहानंतर सासू व पतीने नीलमला चांगली वागणूक दिली मात्र काही दिवसानंतर त्यांनी तिचा शारीरिक व मानसिक छळ केला किरकोळ कारणावरून ते निलमला त्रास देत याबाबत निलमने आईला फोन करून सांगितले होते चप्पलचे दुकान घेण्यासाठी माहेरहुन चार लाख रुपये घेऊन ये असे म्हणून सासू राणी माने व पती अनिकेत माने हे दोघेजण नीलमला वारंवार शिवीगाळ करून मारहाण करत होते या त्रासाला कंटाळून नीलम हिने विंग येथील राहत्या घरातील स्वयंपाक घरात गळफास घेऊन आत्महत्या केली अशी फिर्याद मृत विवाहितेची आई मीना कांबळे यांनी दिली आहे यावरून नीलमला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती अनिकेत माने व सासू राणी माने या दोघांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास तालुका पोलीस करीत आहेत

औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन आलेले प्रकाश आंबेडकर आता म्हणतात... संभाजीराजेंच्या हत्येत हिंदूंचाही सहभाग ;

वेध माझा ऑनलाइन । वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलं आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येच्या कटात हिंदू भटजींचाही समावेश होता, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. देशात सध्या जुन्या राजांची उदाहरणं देऊन समाजात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण ही खरी वस्तुस्थिती नाही, अशी टीकाही आंबेडकरांनी केली. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

संभाजी महाराजांच्या हत्येबद्दल प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “देशात सध्या जुन्या राजांचं उदाहरण देऊन समाजात दुफळी निर्माण केली जात आहे. पण तशी वस्तुस्थिती नाही. त्यांच्या (संभाजी महाराज) हत्येच्या कटात मुघल बादशहाबरोबर भारतातील हिंदू भटजीही होते. हत्येच्या कटात त्यांचाही सहभाग होता, यावर इतिहासकारांनी सविस्तर लिहायला हवं. जेणेकरून देशात पुन्हा कुणी जयचंद कुणी येणार नाही, देशाचं स्वातंत्र जाणार नाही.”

प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले?
संभाजी महाराजांच्या हत्येवर भाष्य करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, “संभाजी महाराज संगमेश्वरावर येथे गुप्त मोहिमेवर होते, असं मानायला हरकत नाही. या मोहिमेची माहिती औरंगाजेबपर्यंत कशी पोहोचली? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. या देशात ज्या राजांचे स्वातंत्र राज्ये होती, ती जयचंदांमुळे अस्ताला गेली. औरंगजेबाने संभाजी महाराजांना ज्याप्रकारे देहदंड दिला, तो निंदनीय आहे. त्याची आम्ही निंदा करतो. पण संभाजी महाराजांना पकडून नेणारेही महत्त्वाचे आहेत.”
प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले, “गणोजीराव शिर्के आणि त्यांचे वडील पिलाजीराव शिर्के यांचा शिवाजी महाराजांबरोबर एक करारनामा झाला होता. पिलाजीराव शिर्के हे योद्धे होते. महाराजांनी त्यांना कोकणात हरवलं होतं. त्यांच्या नियमाप्रमाणे महाराजांनी त्यांची सर्व जमीन आणि मालमत्ता काढून घेतली. त्यानंतर ते सैनिकांमध्ये सामील झाल्यानंतर त्यांना पगार देण्यात आला. तसेच तुमच्या मुलाला (गणोजी शिर्के) मुलगा झाला तर तुमची जमीन परत दिली जाईल, असा शब्द शिवाजी महाराजांनी पिलाजीराव शिर्केना दिला होता. पण दरम्यानच्या काळात शिवाजी महाराजांचं निधन झालं आणि संभाजी महाराज सत्तेवर आले.”

“संभाजीमहाराज हा करारनामा पाळतील, असा विश्वास गणोजी शिर्के यांना वाटला नाही. इतिहासकार म्हणातात, संभाजी महाराज ५०० सैनिकांबरोबर संगमेश्वर येथे आहेत. ही बातमी रंगनाथ स्वामी यांनी औरंगजेबापर्यंत पोहोचवली. त्यानंतर औरंगजेबाने आपल्या फौजा पाठवून संभाजी महाराजांना कैद केलं. भारतात जेव्हा मुस्लीम राजे आले. त्यांनी कत्तली निश्चितपणे केल्या. पण संभाजी महाराजांची हत्या ज्याप्रकारे करण्यात आली, ती पद्धत सुफी किंवा मुस्लीम धर्माला मान्य नाही,” असं आंबेडकरांनी नमूद केलं.
प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले, “नाशिकमध्ये कडू नावाचे लेखक आणि प्राध्यापक आहेत, त्याचं औरंगजेब आणि मनुवाद हत्या संदर्भात एक पुस्तक आहे. त्यामध्ये त्यांनी उल्लेख केला आहे की, औरंगजेबाच्या सल्लागार समितीमध्ये हिंदू कायद्याच्या संदर्भात सल्ला देणारे आबा भटजी होते. त्यांनीच संभाजी महाराजांना शिक्षा कशी द्यावी? हे सुचवलं होतं, असा इतिहासात उल्लेख आहे. मनुस्मृतीप्रमाणे संभाजीमहाराजांना शिक्षा देण्यात यावी, असा सल्ला भटजींनी दिला होता. मग महाराजांना शिक्षा देताना भटजींचा सल्ला अमलात आणला असं मी मानतो 


फडणवीसांनी पवारांना पुन्हा लगावला टोला ; म्हणाले... मी प्राथमिक शाळेत होतो की जन्माला यायचा होतो, त्यामुळे इतिहास बदलत नाही ; आता पवार काय उत्तर देणार ?राज्याचे लक्ष ;

वेध माझा ऑनलाइन । राज्यात एकीकडे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगलेला असताना आता देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यातही तसेच दावे-प्रतिदावे होताना दिसत आहेत. आधी देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना मुत्सद्देगिरीवरून टोला लगावल्यानंतर त्यावर शरद पवारांनी फडणवीसांच्या विधानाचा समाचार घेतला होता. आता माध्यमांशी बोलताना पुन्हा देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.दरम्यान माझं म्हणणं एवढंच आहे की मी प्राथमिक शाळेत होतो की जन्माला यायचा होतो, त्यामुळे इतिहास बदलत नाही असाही टोला फडणवीसांनी पुन्हा पवारांना लगावला आहे

नेमका वाद काय?
देवेंद्र फडणवीसांनी रविवारी भाजपाच्या एका कार्यक्रमात बोलताना विरोधकांवर टीका करण्यासाठी शरद पवारांच्या पुलोद सरकारच्या प्रयोगाचा दाखला दिला. “१९७८ मध्ये शरद पवार हे वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळातील ४० आमदार घेऊन बाहेर पडले होते. त्यांनी तेव्हाच्या भाजपाबरोबर सरकार स्थापन केलं. ते सरकार दोन वर्षं चाललं. पंतप्रधान इंदिरा गांधींनी ते सरकार बरखास्त केलं नसतं तर ते सरकार पाच वर्षं चाललं असतं. म्हणजे तेव्हा पवारसाहेबांनी जे केलं ते मुत्सद्देगिरी आणि तेच एकनाथ शिंदे यांनी केलं तर गद्दारी? असं कसं चालेल?” असा सवाल फडणवीसांनी केला होता... त्यानंतर... पवारांनी फडणवीसांच्या या खोचक बोलण्याचे उत्तर देताना...फडणवीस त्यावेळी लहान असतील...त्यामुळे त्यांना काही माहीत नसेल...असा उलट टोला लगावला होता

शरद पवार म्हणाले ते खरं आहे”
दरम्यान, आता शरद पवारांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा टोला लगावला आहे. “शरद पवार म्हणाले ते खरं आहे की १९७७ मध्ये मी प्राथमिक शाळेतच होतो. पण मी काल जे बोललो, ते एकतर शरद पवारांनी ऐकलं नाही किंवा ऐकलं तरी ते त्यांना अस्वस्थ करणारं होतं. म्हणून त्यांनी त्याला बगल देण्याचा प्रयत्न केला”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“१९७८ साली शरद पवारांनी वसंतदादा पाटलांबरोबर ते मंत्री होते त्यावेळी काँग्रेस पक्ष फोडला. त्यातले ४० लोक बाहेर काढले आणि भाजपाबरोबर त्यांनी सरकार तयार केलं. आता एकनाथ शिंदे तर आमच्याबरोबरच निवडून आले होते. ते तिथून ५० लोक घेऊन बाहेर पडले. त्यांनी आमच्याबरोबर सरकार स्थापन केलं. मग शरद पवारांनी तयार केलेलं सरकार ही मुत्सद्देगिरी आणि शिंदेंनी तयार केलेलं सरकार ही बेईमानी कशी होऊ शकते? मी कुठेही शरद पवारांनी बेईमानी केली असं म्हटलं नाही.एकनाथ शिंदेंची केस तर मेरिटची आहे. एकनाथ शिंदे आमच्याबरोबर युतीत निवडून आले. शरद पवार तर काँग्रेसबरोबर निवडून आले होते आणि नंतर भाजपाबरोबर आले”, असं फडणवीस म्हणाले.

“माझं म्हणणं एवढंच आहे की मी प्राथमिक शाळेत होतो की जन्माला यायचा होतो, त्यामुळे इतिहास बदलत नाही. कुणीही जन्माला आलं, नाही आलं, कधी आलं यावर इतिहास ठरत नसतो. इतिहासात हे लिहून ठेवलं आहे की शरद पवारांच्या नेतृत्वाखाली ४० लोकांनी वसंतदादा पाटलांचं सरकार पाडलं आणि भाजपाबरोबर सरकार तयार केलं. तेच मी सांगितलंय”, असंही फडणवीस म्हणाले.

 

1978 ला पवारसाहेब 40 आमदार घेऊन बाहेर पडले होते ती ‘मुत्सेद्देगिरी’... आणि तेच एकनाथ शिंदे यांनी केले तर गद्दारी? ; फडणवीसांचा खोचक सवाल ; यावर शरद पवार यांनी काय उत्तर दिले...?

   राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगला आहे. एकीकडे उद्धव ठाकरे  आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात टोलेबाजी सुरु असताना दुसरीकडे फडणवीस यांनी शरद पवार  यांच्याबाबत केलेल्या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. चंद्रपूरमध्ये मोदी सरकारच्या 9 वर्षापूर्तीनिमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं. यावेळी त्यांनी शरद पवार यांचा उल्लेख करत 1978 च्या घडामोडीचा संदर्भ दिला. फडणवीसांच्या वक्तव्यावर शरद पवार यांनी प्रत्युत्तर देताना खोचक टोला लगावला आहे.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना लक्ष्य करताना 1977 साली स्थापन केलेल्या सरकारचा संदर्भ दिला. 1978 मध्ये शरद पवार हे वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळातील 40 आमदार घेऊन बाहेर पडले होते. त्यांनी त्यावेळच्या भाजपाबरोबर सरकार स्थापन केले. ते सरकार दोन वर्षे चालले. पंतप्रधान इंदिरा गांधींनी ते सरकार बरखास्त केले नसते तर ते सरकार पाच वर्षे चालले असते. म्हणजे तेव्हा पवारसाहेबांनी जे केले ते ‘मुत्सेद्देगिरी’ आणि तेच एकनाथ शिंदे यांनी केले तर गद्दारी? असं कसं चालेल? असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला.

तेव्हा फडणवीस लहान असतील
देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावर शरद पवार यांनी सोमवारी सकाळी पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर देताना खोचक टोला लगावला. मी कधी मुत्सद्देगिरी केली? त्यांनी सांगावे. 1977 साली आम्ही सरकार बनवलं. पण त्यावेळी भाजप माझ्यासोबत होती. तेव्हा देवेंद्र फडणवीस लहान असतील. त्यामुळे त्यांना कळलं नसेल. त्यांना कदाचित पुरेसा इतिहास माहिती नसेल. पण त्यांच्या माहितीसाठी सांगतो, मी सगळ्यांना घेऊन सरकार बनवलं होतं. त्यावेळच्या जनसंघाचे उत्तमराव पाटील उपमुख्यमंत्री होते. इतरही काही सदस्य होते, असे शरद पवार म्हणाले.

अज्ञानापोटी असं वक्तव्य
शरद पवार पुढे म्हणाले, मला वाटतं देवेंद्र फडणवीस कदाचित तेव्हा प्राथमिक शाळेत  असतील. त्यामुळे त्यांना तेव्हाची फारशी माहिती नसेल. ते अज्ञानापोटी असं वक्तव्य करत आहेत. यापेक्षा काही फारसं भाष्य करण्याची आवश्यकता नाही, असा टोला त्यांनी लगावला.

Sunday, June 25, 2023

बाळासाहेब देसाई हे लोकनेते होते, त्यांच्या नातवाने मात्र शेण खाल्लं ; संजय राऊत यांची मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर जहरी टीका;

वेध माझा ऑनलाइन । लोकनेते बाळासाहेब देसाई हे  मोठे नेते होते त्यांचे व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते दुसऱ्या पक्षात असूनही ते नेहमी मराठी माणसाच्या लढ्यात सहभागी झाले त्यांच्या नातवाने मात्र शेण खाल्ले गद्दारी केली अशी टीका संजय राऊत यांनी मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर केली ते आज कराड येथे पत्रकारांशी बोलत होते त्यानी आज कराडात येवून पत्रकारांच्या विविध विषयांवरील प्रश्नांची आपल्या हटके स्टाईलने रोखठोक उत्तरे दिली

ते म्हणाले प्रकाश आंबेडकरांशी अजून आमची युती झालेली नाही त्यांच्या औरंगजेबाच्या कवरीवर जाण्याचे समर्थन होऊ शकत नाही पण याचे उत्तर पत्रकारांनी फडणवीसांनाही विचारले पाहिजे ते सत्ताधारी आहेत ना? हिंदुत्वाचा त्यांच्याकडे ठेका आहे ना?ते आणि शिंदे मागच्या वेळी म्हटले होते ती कबर उखडून टाकू... मग आता तुमची सत्ता आहे वाट कसली बघताय उखडून टाका ना जेसीबी आम्ही देऊ भाजपने ढोंग करू नये असा उलट टोलाही त्यांनी लगावला 

मेहबुबा मुफ्ती व उद्धव ठाकरे एका बैठकीत एकत्र कसे दिसले ?या प्रश्नावर बोलताना राऊत म्हणाले मुफ्ती मुख्यमंत्री होत्या त्यांच्या शपथविधीला मोदी अमित शहा देखील त्यांच्या समवेत नव्हतें का? अगोदर हा प्रश्न त्यांना विचारा महाविकास आघाडीमध्ये जो जो ज्या ठिकाणी निवडून येण्याची क्षमता बाळगतो तीथे त्या त्या पक्षाचा उमेदवार उभा राहणार असे सांगून महाविकास आघाडी एकत्रपणे येणाऱ्या निवडणूका लढेल असेही ते म्हणाले तसेच भाजपची सत्ता उलथवून टाकण्यासाठी महाविकास आघाडी सर्व प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले राज्याला भाडोत्री व गद्दार मुख्यमंत्री मिळाला असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली

संजय राऊत म्हणाले...इंद्रजित गुजर यांच्या शिवसेना प्रवेशासाठी स्वतः उद्धव ठाकरे इच्छुक ; इंद्रजित गुजर म्हणाले...100 टक्के प्रवेश करणार...

वेध माझा ऑनलाइन । इंद्रजित गुजर यांच्या शिवसेना प्रवेशा करिता स्वतः उद्धव ठाकरे इच्छुक आहेत  लवकरच गुजर यांचा प्रवेश मातोश्रीवर होईल असे सूतोवाच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज कराड येथे केले आज पाटण तालुक्यातील तळमावले याठिकाणी कार्यक्रमाकरिता ते आले आहेत दरम्यान कराड येथे त्यांनी गुजर यांच्या आहेर कॉलेजवर जाऊन भेट दिली व गुजर यांच्याशी काहीकाळ कमराबंद चर्चा केली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते 

ते पुढे म्हणाले मी अस ऐकलय की गुजर हे राजकारण कमी आणि समाजकारण अधिक करतात त्यांचा संपर्क दांडगा आहे ते उत्तम संघटक आहेत माझा त्यांच्याशी जुना सम्बन्ध आहे त्यांनी शिवसेनेत यावे यासाठी आम्ही सगळे तसेच स्वतः उद्धव ठाकरेही इच्छुक आहेत लवकरच त्यांचा मातोश्री वर प्रवेश होईल 

इंद्रजित गुजर म्हणाले मी 100 टक्के उद्धव ठाकरे सेनेत प्रवेश करणार आहे मात्र माझ्या आजी-माजी सहकाऱ्यांशी चर्चा करून मी पुढच्या आठवड्यात या प्रवेशाचा मुहूर्त ठरवेंन माझा हा प्रवेश  मातोश्रीवर झाला तरी कराड मध्ये त्यांनतर प्रचंड मोठा कार्यक्रम घेऊन शिवसेना वाढीसाठीच्या संघटनात्मक कामाला आपण लागणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले 

गेल्या पंचवार्षिक पालिका निवडणुकीत मी अपक्ष निवडून आलो आहे आणि आ पृथ्वीराज चव्हाण यांना मी पाठिंबा दिला होता आमदार चव्हाण यांना आमच्या शिवसेनेत प्रवेश करण्याने धक्का वगैरे बसण्याचा काही प्रश्नच नाहीये कारण महाविकास आघाडीचा हिस्सा म्हणून आम्ही निवडणुकीत एकत्रच असू आणि ते आघाडीचे नेतेच आहेत यावेळी माजी नगरसेवक अप्पा माने यांनीही इंद्रजित गुजर यांच्या बरोबरीने ते म्हणतील त्या दिशेने पुढे राजकिय वाटचाल करणार असल्याचे यावेळी संगितले

Saturday, June 24, 2023

वेध माझा ऑनलाइन ।  शुक्रवारी रात्री दोन ते अडीचच्या सुमारास कराड तालुक्यातीलओंड, उंडाळे, टाळगाव या सह विभागात अकरा घरे अज्ञात चोरट्यानी घराची कुलपे तोडून घरातील साहित्याची नासधूस करत मौल्यवान वस्तू सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केली.

याबाबत सविस्तर माहिती अशी, उंडाळे परिसरात रात्री वीजपुरवठा खंडीत झाला होता. त्याचाच फायदा घेत चोरट्यांनी तेथील बंद घराचे समोरील कुलूप तोडून घरातील टेबलचे ड्राव्हर उचकटून तसेच घरातील साहित्य विस्कटून चोरीचा अयशस्वी प्रयत्न केला. राहूल बाजीराव पाटील यांच्याही बंद बंगल्याचे कुलूप तोडून घरातील कपाटे, तिजोरीतील रोख सुमारे तीस हजाराची रोकड तसेच सुमारे साडेतीन चार तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. या दरम्यान चोरट्यांनी घरातील व कपाटातील साहित्य विस्कटून टाकले होते तसेच जवळच असलेल्या अन्य काही ठिकाणी चोरत्यानी चोरी केली 
घटनेची माहिती पोलीस पाटील शुभांगी पवार यांनी दिल्यानंतर उंडाळे पोलीस ठाण्याचे हवालदार सुनिल माने, राजू पाटोळे यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर, कराड ग्रामीणचे पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी घटनास्थळी भेट दिली. 

सोमवार 3 जुलै रोजी जयंत गुजर परिवाराच्या वतीने कराडात गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन ; भक्त भाविकांनी सहपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित रहा ; गुजर परिवाराच्या वतीने आग्रहाचे निमंत्रण...

वेध माझा ऑनलाइन - येथील साईभक्त जयंत  गुजर यांच्यावतीने प्रतिवर्षीप्रमाणे याहीवर्षी सोमवार दिनांक 3 जुलै रोजी जुने कृष्णामाई मंगल कार्यालय येथे गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होणार असल्याची माहिती स्वतः जयंत गुजर यांनी दिली यावर्षी या उत्सवाचे 26 वे वर्ष आहे

श्री जयंत गुजर म्हणाले...सोमवार दिनांक 3 जुलै रोजी पहाटे सव्वापाच वाजता काकड आरतीने या उत्सवास प्रारंभ होईल... त्यानंतर 6 वाजता अभिषेक होईल... 7 वाजता सत्यनारायण महापूजा होणार आहे, तसेच 9 वाजता स्तवनमंजिरीचे वाचन होईल. दुपारी 12 वाजता माध्यान आरती होईल, त्यानंतर साडेबारा वाजता महाप्रसाद सुरू होणार आहे... दुपारी 4.30 यर्यंत महाप्रसादाचा लाभ भक्तांना मिळणार आहे...  सायंकाळी 6 30 वाजता धुप आरती व रात्री 10 वाजता शेजारती होणार आहे... अशी माहिती जयंत गुजर यांनी दिली आहे...

तरी जास्तीत जास्त भक्त भाविकांनी आपल्या परिवारासह या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन गुजर परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे गेली 25 वर्षे जयंत गुजर परिवार हा उत्सव  साजरा करत आहेत यावर्षी या उत्सवाचे 26 वे वर्ष आहे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संवेदनशीलपणा ; तारा पिंपरीतांब गावातील भागडवाडीतील गरीब वृध्द दाम्पत्याला मदतीचा हात :पावसाळ्यात अन्यत्र पुनर्वसन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश ;

वेध माझा ऑनलाइन। आपल्या मुळगावाकडून मुंबईकडे परतणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा अचानक एका गावाजवळ थांबतो...निराधार वृद्ध दाम्पत्याबाबत त्यांना माहिती मिळते....आपल्या पदाचा, राजशिष्टाचाराचा बाऊ न करता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट जमिनीवर बसून त्यांच्याशी संवाद साधतात..आपुलकीने विचारपूस करतात...जिल्हा प्रशासनाला त्या वृध्द दाम्पत्याच्या पुनर्वसनाचे निर्देश देतात...आणि मुख्यमंत्री मार्गस्थ होतात...

आपला संवेदनशील स्वभाव कृतीतून पुन्हा एकदा दाखवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वृद्ध दाम्पत्याचे पुनर्वसन करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. जमिनीवर खाली बसून त्या वृध्द दाम्पत्याची आस्थेने चौकशी केली. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या त्यांच्या मूळगावी दरे येथे गेले आहेत. त्याचवेळी पिंपरीतांब गावातील एका गरीब दाम्पत्याची त्यांनी आस्थेवाईकपणे चौकशी करून त्यांचे तातडीने पुनर्वसन करण्याचे निर्देश सातारा जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. 

आपल्या मुळ गावी दरे येथे वास्तव्यात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज तापोळा आणि दरे दरम्यान नव्याने तयार होत असलेल्या पुलाच्या कामाची पाहणी केली. यावेळी एका ग्रामस्थाने त्यांना जवळच एक निराधार वृद्ध दाम्पत्य रहात असल्याचे निदर्शनास आणून दिले. क्षणाचाही विलंब न लावता मुख्यमंत्री श्री. शिंदे त्यांच्या भेटीला गेले. 

पिंपरीतांब येथील भागडवाडीतील ७५ वर्षाचे विठ्ठल धोंडू गोरे आपल्या पत्नीसह याठिकाणी राहतात. त्यांची देखभाल करणार कुणीही नसल्याने  आहे त्या तुटपुंज्या संसारात ते दोघं उघड्यावरच रहातात. मुख्यमंत्री श्री. शिंदे त्यांच्याजवळ गेले. थेट जमिनीवर बसून त्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. पावसाळ्यात तुम्ही अशा अवस्थेत कसे राहणार..? त्याऐवजी गावाजवळ का रहात नाही असे त्यांना विचारले. मात्र त्यावर त्यांनी काहीही ठोस उत्तर दिले नाही. अखेरीस मुख्यमंत्र्यांनी या दाम्पत्याला पावसाळ्यात लागेल तेवढे अन्न धान्य आणि मदत देण्याचे निर्देश दिले. अशा ठिकाणी राहत असल्याने त्यांना अचानक मदत लागल्यास कुणीही मदत करू शकणार नाही त्यामुळे गावाजवळ रहावे अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी त्याना केली. साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना या वृद्ध दाम्पत्याचे त्वरित पुनर्वसन करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. पिंपरीतांब येथील भागडवाडीतील विठ्ठल गोरे यांना मदत करताना त्यांच्यातली संवेदनशीलता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

उद्या कराडात संजय राऊत इंद्रजित गुजर यांच्या भेटीला येणार ; माजी नगरसेवक गुजर यांच्या निकटवरतीयांनी वेध- माझाला दिली माहिती :

वेध माझा ऑनलाइन । कराडचे नगरसेवक इंद्रजित गुजर याची भेट घेण्यासाठी बनवडी येथील डॉ दौलतराव आहेर अभियांत्रिकी महाविद्यालय येथे उद्या रविवारी सकाळी 11 वाजता शिवसेना नेते संजय राऊत येणार असल्याचे माजी नगरसेवक इंद्रजित गुजर यांच्या निकटवरतीयांनी वेध माझाशी बोलताना सांगितले त्यामुळे इंद्रजित गुजर ठाकरे गटात प्रवेश कधी करणार... याबाबतच्या चर्चा आता पुन्हा सुरू झाल्या आहेत आणि त्यांच्या प्रवेशाबद्दलचा खुलासा उद्याच होईल अशी अपेक्षा देखिल कराडकरांना आहे

दरम्यान इंद्रजित गुजर हे उद्धव ठाकरे गटात जाणार असल्याची चर्चा खूप दिवसापासून सुरू आहे मात्र त्यांच्या कन्येचा विवाह सोहळा पार पडल्यानंतर ते काही दिवसानी पक्षप्रवेश करतील असे ऐकिवात होते  त्यांच्या कन्येचा विवाह काल शुक्रवारी सम्पन्न झाला या विवाह सोहळ्यासाठी स्वतः संजय राऊत व ठाकरे कुटुंबीयांनी इंद्रजीत गुजर यांच्या कन्येला व्हीडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आशीर्वाद दिल्याचे सर्व उपस्थित जनसमुदायाने काल पाहिले 

उद्या ढेबेवाडी परिसरात संजय राऊत काही कार्यक्रमाच्या निमित्ताने येणार आहेत त्यापूर्वी सकाळी 11 वाजता ते इंद्रजित गुजर याना भेटण्यासाठी बनवडी येथील आहेर कॉलेज येथे  येणार आहेत असे गुजर यांच्या निकटवरतीयांनी वेध माझाला सांगितले आहे

नगरसेवक इंद्रजित गुजर व अप्पा माने यांनी आपला स्वतंत्र गट निर्मितीसाठी प्रयत्न सुरू केले असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे अप्पा माने हे काँग्रेसचे शहर अध्यक्ष होते त्यांना विश्वासात घेतले नाही आणि अचानक पदावरून हटवण्यात आले अशी भावना अप्पा मानेंसह बाबा गटातील अनेकांची झाली व त्यातून नाराजी पसरत ठाकरे गटाची एन्ट्री कराडात झाली अशी देखील चर्चा असते

काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांनी इंद्रजित गुजर यांच्या निवासस्थानी अचानक भेट दिली होती त्यापूर्वी सेना नेते विनायक राऊत हे देखील इंद्रजित गुजर याना भेटले असल्याची बातमी मिळाली होती शिवसेनेतून त्यांना मोठी ऑफर दिल्याचेही वृत्त आहे स्वतः गुजर व त्यांच्याबरोबर असणारे शहरातील काही आजी - माजी काही नगरसेवक ठाकरे ,गटात जाण्यासाठी इच्छुक आहेत असे कळते सुरुवातीला शिवसेनेच्या कोणत्या पदावर गुजर यांच्यासह त्यांच्या समर्थकाना पदाची ऑफर केली जाते व कोणत्या पदावर तडजोड होते हे बघून व त्यावर चर्चा होऊन मगच गुजर व त्यांच्या आजी माजी सहकाऱ्यांचा मातोश्रीवर जाऊन किंवा कराडात मोठा कार्यक्रम घेऊन उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार असल्याचे देखील वृत्त आहे
 
कराड पालिका निवडणुकीत अचानकपणे जुनी जनशक्ती आघाडी बाबा गटाचे नेतृत्व करणार आणि आपण मागे पडणार तसेच आपल्याला बाबा गटातून संधी मिळणार नाही असाच अचानक डच्चू दिला तर पर्याय काय ? या विवनचनेत असणाऱ्या नाराजांची ठाकरे गटात प्रवेश होण्याची प्रक्रिया होणार आहे असे असली तरी ऐन पालिका निवडणुकीत बाबा गटासाहित होणाऱ्या महाआघाडीचे सदस्य म्हणून हेच नगरसेवक ठाकरे गटाच्या माध्यमातून पुन्हा बाबा गटाबरोबर हातात हात घालून एकत्र येत भाजप- शिंदे गटाशी दोन हात करण्यासाठी शहरात पुन्हा एकत्र दिसतील असेही खात्रीलायक वृत्त आहे

सध्या महाआघाडीचा प्रयोग एकूणच झालेल्या 
आत्तापर्यंतच्या निवडणुकीसाठी राज्यात यशस्वी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे याचाच धागा पकडून कराड पालिकेसाठी देखील महाआघाडी होणार हे निश्चित मानले जात आहे परंतु कराडात दोन काँग्रेसच्या तुलनेत शिवसेनेचे म्हणावे असे प्राबल्य नाही म्हणूनच महाआघाडीची ताकद कराडात वाढावी यासाठीच नगरसेवक गुजर यांचा ठाकरे गटात होणारा प्रवेश ही एक प्रकारची खेळी तर नाही ना ? अशीही चर्चा सध्या सुरू आहे...त्याच खेळीचा भाग म्हणून संजय राऊत व गुजर यांच्या उद्याच्या भेटीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे !

Friday, June 23, 2023

रशियामध्ये रातोरात मोठ्या हालचाली ; मॉस्कोच्या रस्त्यांवर अनेक टँकर, मोठ्या प्रमाणावर सैन्याची वाहने तैनात ;

वेध माझा ऑनलाइन । युक्रेनवर पहिल्याच दोन दिवसांत विजय मिळविण्याच्या इराद्याने रशियाने केलेला हल्ला फसला आहे. आता दीड वर्ष झाले तरी युक्रेनच्या मोठ्या भूभागावर कब्जा करता आलेला नाहीय. युद्ध थांबवले तर नाचक्की आणि सुरु ठेवले तरी नाचक्कीच अशा पेचात सापडलेल्या रशियामध्ये रातोरात मोठ्या हालचाली झाल्या आहेत. 

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना त्यांची सत्ता उलथवून लावली जाण्याची भीती सतावू लागली आहे. यामुळे त्यांनी राष्ट्राध्यक्ष कार्यालय क्रेमलिनच्या सुरक्षेसाठी मॉस्कोत रणगाडे तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांचाच खाजगी मिलिशिया वॅगनर ग्रुप त्यांना सत्तेतून काढून टाकण्यासाठी बंडाचा प्रयत्न करू शकतात, अशी भीती पुतीन यांना वाटू लागली आहे. रातोरात मॉस्कोच्या रस्त्यांवर अनेक टँकर पाहून नागरिकांमध्ये देखील भीतीचे वातावरण तयार झाले आहे. क्रेमलिनच्या आजुबाजुच्या परिसरात केवळ टँकच नाही तर मोठ्या प्रमाणावर सैन्याची वाहने दिसू लागली आहेत. 

युक्रेनमधील बाखमुट येथील वॅगनर प्रशिक्षण शिबिरावर क्षेपणास्त्र हल्ला झाला होता. यामुळे या संघटनेचा प्रमुख येवगेनी प्रीगोझिन संतापला आहे. त्याने यासाठी क्रेमलिनला जबाबदार मानले आहे. यासाठी रशियाला शिक्षा आणि सूड उगवण्याची शपथही त्यांनी घेतली आहे. वॅगनरचे डझनभर सैनिक मारले गेले आहेत. आम्ही मॉस्कोकडे कूच करत आहोत. जो कोणी आमच्या केंद्रात प्रवेश करेल तो यासाठी जबाबदार असेल, असे त्याने म्हटले आहे. 

वॅगनर गटाच्या सैनिकांनी नोव्होचेरकास्कच्या मार्गावरील पहिली चौकी आधीच ओलांडली आहे. रशियन सैन्याचे मुख्यालय नोवोचेरकास्क येथे आहे. त्यानंतर मॉस्कोच्या रस्त्यावर चिलखती वाहनांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. अमेरिकाही या घटनेवर बारीक लक्ष ठेवून आहे. रशियन स्पेशल फोर्सने मॉस्कोभोवती नाकाबंदी केली असल्याचे सांगण्यात येत आहे. 

रशियाची महत्त्वाची लष्करी चौकी रोस्तोवमध्ये रणगाडे आणि चिलखती वाहने दिसली आहेत. याआधीच्या फुटेजमध्ये एक चिलखती वाहनांचा ताफा पुतीन यांना आणीबाणीच्या बैठकीसाठी क्रेमलिनला घेऊन जात असल्याचे दिसले. पुतिनच्या जवळच्या श्रीमंत लोकांमध्ये दहशत पसरली आहे. मॉस्कोजवळील फ्रायझिनो येथे आज रात्री एक लष्करी युनिट जळत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.


एसबीआयची ऑनलाइन डिजिटल लॉकरची सुविधा उपलब्ध ; आता तुमची महत्वाची कागदपत्रे ठेवा सुरक्षित ;

वेध माझा ऑनलाइन । भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयने आपल्या ग्राहकांसाठी ऑनलाइन डिजिटल लॉकरची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने ही सुविधा आणली असून, यामध्ये तुम्ही तुमचे लॉकर ऑनलाइन माध्यमातून उघडू शकता. येथे तुम्ही तुमचे महत्त्वाचे दस्तऐवज सहज ठेवू शकता. हे लॉकर्स अतिशय सुरक्षित आहेत.

डिजिलॉकरला डिजिटल लॉकर असेही म्हणतात. हे तुम्हाला अस्सल आभासी दस्तऐवजांची सोय देते. हे एक प्रकारचे डिजिटल दस्तऐवज वॉलेट आहे. यामध्ये तुम्ही तुमची कागदपत्रे जमा करू शकता. जेव्हा तुम्ही हे लॉकर उघडता, तेव्हा तुम्हाला अनेक कागदपत्रे एका क्लिकवर मिळणार आहेत. हे लॉकर तुमच्या आधार क्रमांकाशी जोडलेले आहे.

या लॉकरमध्ये तुम्ही तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, व्होटर आयडी, पॉलिसी यांसारखी अनेक कागदपत्रे सुरक्षित ठेवू शकता. यासाठी तुम्हाला हे डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील. लॉकरसाठी साइन अप करताना तुम्हाला ही कागदपत्रे अपलोड करावी लागतील. अशा प्रकारे तुम्ही तुमची कागदपत्रे सुरक्षित ठेवू शकता. यामध्ये तुम्हाला एक समर्पित क्लाउड स्टोरेज स्पेस मिळेल. ग्राहक या लॉकरमध्ये खाते विवरण, फॉर्म १५ ए आणि गृहकर्जाचे व्याज प्रमाणपत्रदेखील ठेवू शकतात. तुम्ही या लॉकरमध्ये कुठेही प्रवेश करू शकता, असंही एसबीआयने सांगितले.

डिजिटल लॉकर काय आहे?
भारत सरकार डिजिटल इंडिया बनवण्यासाठी पुढाकार घेत आहे. भारतात पेपरलेस प्रणाली निर्माण करणे हा त्याचा उद्देश आहे. अशा परिस्थितीत आता ई-कागदपत्रांची देवाणघेवाण होणार आहे. एक काळ असा होता की, एखादा कागदपत्र हरवला जरी हरवला की तो पुन्हा तयार करायला बराच वेळ लागायचा. आता डिजिटलायझेशनच्या माध्यमातून ही समस्या संपुष्टात आली आहे. यामध्ये तुम्ही तुमची महत्त्वाची कागदपत्रे ठेवू शकता. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे लॉकर तुमच्या आधार कार्डशी जोडलेले आहे.


  

कराड नगरपरिषदेला करावी लागणार पाणी कपात ; 26 जून पासून सकाळी व सायंकाळी 15 मिनिटे पाणी पुरवठा केला जाणार कमी ;

वेध माझा ऑनलाइन। यावर्षी पाऊस लांबला असून कोयना धरणात अल्प पाणीसाठा असल्याने सर्वत्र पाणीटंचाई जाणवणार आहे. या पार्श्वभूमीवर कराड नगरपरिषदेला पाणीपुरवठा करताना पाणी कपात करावी लागणार आहे. त्यामुळे 26 जून पासून सकाळी व सायंकाळी 15 मिनिटे पाणी पुरवठा कमी केला जाणार आहे. याची नागरिकांनी दखल घेऊन पिण्याच्या पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आव्हान मुख्याधिकारी शंकर खंदारे यांनी प्रसिद्ध पत्रकारद्वारे केले आहे.

कराड नगर परिषदेकडून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कराड शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत व उन्हाळ्याची तीव्रता वाढत चाललेली आहे. सरासरी सात जून नंतर आपल्याकडे पावसाळा सुरू होतो परंतु यावर्षी 23 जून अखेर अद्याप पाऊस सुरू झालेला नाही. त्यामुळे कराड शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या कोयना धरणात खूप कमी पाणीसाठा शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणीटंचाई निवारण करिता विशेष कृती आराखडा करून त्याच्या अंमलबजावणी करण्याबाबत शासनाकडून सूचना मिळाल्या आहेत.

तसेच जलसंपदा विभागाकडून नळ पाणीपुरवठा योजनेस पिण्याचे पाणी वापरास कोयना नदीतून पाणी उचलण्यास मान्यता मिळालेल्या पाणी कोटापैकी सुमारे 60 टक्के पाणी कोटा वापरून पूर्ण झालेला आहे. त्यामुळे नदीतून पाणी उचलण्यासाठी उर्वरित पाणी कोटा जपून वापरणे आवश्यक आहे. म्हणजे तो पाणी कोटा जास्त दिवस पुरेल. अन्यथा नगर परिषदेस भीषण पाणीटंचाईस सामोरे जावे लागेल. याकरिता पाणी कपात करणे हे आवश्यक आहे

सध्या स्थितीत पाणी कपात करून पाण्याचा वापर कमी केला तर भविष्यात पाऊस पडेपर्यंत सदरचा पाणीपुरवठा पुरेल. त्यामुळे कराड नगर परिषदेमार्फत केला जाणाऱ्या पाणीपुरवठा वेळेत 26 जून पासून सकाळी व सायंकाळी पंधरा मिनिटे कमी केला जाणार आहे. तरी नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा वापर काटकसरीने करावा. पिण्याच्या पाण्याची बचत करावी व नगरपरिषद सहकार्य करावे अशीही या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे..

सुरेखा पुणेकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ; केला दुसऱ्या पक्षात प्रवेश ; लढवणार विधानसभा निवडणूक! ;

वेध माझा ऑनलाइन । प्रसिद्ध लोककलावंत आणि लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम केला आहे. सुरेखा यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत हैदराबादच्या भारत राष्ट्र समितीत प्रवेश केला. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत सुरेखा पुणेकर यांनी काल (२२ जून) पक्षप्रवेश केला.

गेल्या काही दिवसांपासून अनेक कलाकार हे राजकीय पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत. आपल्या घुंगरांच्या तालावर नाचवणाऱ्या आणि सौंदर्याने सगळ्यांना घायाळ करणाऱ्या लोकप्रिय नृत्यांगणा सुरेखा पुणेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत दुसऱ्या पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

सुरेखा पुणेकर यांनी काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या धुमधडाक्यात प्रवेश केला होता. पण आता दोन दिवसांपूर्वीच त्यांनी हैदराबाद येथील भारत राष्ट्र समिती या पक्षात प्रवेश केला. तेलंगणाचे मुख्यमंत्री के.सी.राव यांच्या बीआरएस पक्षात सुरेखा यांनी प्रवेश केला आहे. सुरेखा पुणेकर या दोन दिवसांआधीच हैदराबादमधील डेरे येथे दाखल झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी अनेक भेटीगाठीही घेतल्या होत्या. त्यानंतर आता त्यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ काढून बीआरएसचा झेंडा हाती घेतला आहे.

सुरेखा पुणेकर यांनी काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळेच त्यांनी बीआरएसमध्ये पक्षप्रवेश केल्याचे सांगितले जात आहे. त्या मोहोळ किंवा देगूलूर या दोन मतदारसंघातून बीआरएसच्या तिकिटावर लढण्याची शक्यता आहे.

Thursday, June 22, 2023

फडणवीस कराडात येऊन म्हणाले...अतुल भोसले कराड दक्षिणचे आमदार होणार ...आणि म्हणाले... या जिल्ह्याचा खासदार भाजपचा होणार...उदयनराजेच होणार...असे का म्हटले नाहीत... काय आहे फडणवीसांच्या मनात ?

वेध माझा ऑनलाइन। सातारा जिल्ह्याचा खासदार हा भाजपचाच असेल... आणि कराड दक्षिण चे आमदार डॉ अतुलबाबाच होणार... अशा भाषेत राज्याचे उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांनी आज कराड येथील कल्याणी मैदान येथे भाजपच्या झालेल्या जाहीर सभेत स्पष्टपणे सांगितले.. मात्र जिल्ह्याचे खासदार कोण होणार याबाबत त्यांनी उदयनराजे यांचे नाव घेतले नाही...साताऱ्याचे खासदार भाजपचाच होणार ..एवढंच ते बोलले... खरतर त्यांनी जसा अतुलबाबांचे नाव घेत कराड दक्षिणचे भावी आमदार म्हणून उल्लेख केला... तसा भाजपचे भावी खासदार म्हणून उदयनराजे यांचे नाव घेणे अपेक्षित होते...मात्र तसे झाले नाही... म्हणूनच उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीबाबत पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजप काय निर्णय घेणार ? फडणवीसांच्या मनात नेमकं काय चालले आहे ? अशा चर्चा आता यानिमित्ताने सुरू झाल्या आहेत

मागील विधानसभा निवडणुकीत अतुल भोसले हे माजी मुख्यमंत्र्यासमोर मोठ्या ताकदीने लढले  मात्र हेच तरुण तडफदार आणि देखणं व्यक्तिमत्त्व यावेळी नक्की आमदार होणार असे गौरवोद्गार फडणवीस यांनी यावेळी आवर्जून काढले... त्याचवेळी सातारा जील्ह्याचे खासदार भाजपचाच होणार एवढंच ते म्हणाले... यावेळी अतुलबाबा आमदार होणार असे ठामपणे ते  म्हणाले तसे... उदयनराजे खासदार होणार असेही त्यांना म्हणता आले असते...मात्र ते म्हणाले नाहीत... 

दरम्यान , यावेळी देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वसामान्यांना विकासाचे भागीदार केले आहे. गरीब कल्याणाचा अजेंडा राबवला आहे. मोदी अमेरिकेत गेले असताना महाराष्ट्रातील एक नेते, त्यांनी अमेरिकेऐवजी मणिपूरला जायला हवे होते, असे म्हणतात. परंतु त्यांना आमचे सांगणे आहे की, मणिपूर सांभाळायला आमचे गृहमंत्री अमित शहा पुरेसे आहेत. मोदींनी जाण्याची आवश्यकता नाही. मात्र तुम्ही मातोश्रीपासून वरळीपर्यंत गेला नाहीत. तुम्हाला मोदींवर बोलण्याचा अधिकार नाही. मोदींनी देशात कोविडची लस तयार केली, असे मी म्हणालो होतो. ते उद्धव ठाकरे यांना झोंबले. मग उद्धव ठाकरे राज्य चालवतो असे म्हणतात. ते काय घोडय़ावर बसून घोडा हाकत होते का? लस मोदींनीच लस तयार केली. कारण या लसीचे रॉ मटेरियल पाच देशांकडे होते. तेथे जाऊन 1800 कोटी देऊन रॉ मटेरियल उपलब्ध केले. ही लस तयार केल्यानंतर कित्येकांना ही मोफत लस उपलब्ध करून दिली. लस मिळाली नसती तर देशात आज काय परिस्थिती असती. मोदी सरकारने हिमतीने निर्णय घेतल्याने साखर कारखाने जिवंत राहिले. इथेनॉल पॉलिसी आणल्याने कारखानदारी आणि शेतकरी वाचला. आता शासन शेतकऱयांना 1 रूपयांत पीक विमा देणार आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत शेतकऱयांना 12 तास वीज देण्यात येणार आहे. आम्ही 2014 साली सत्तेवर आलो. त्यावेळी महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आणला होता. मध्यंतरीच्या तीन वर्षात तो पुन्हा मागे गेला. आता गेल्या वर्षभरात आम्ही व एकनाथ शिंदे मिळून महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत. 2019 साली आम्ही सत्तेवर असताना जिल्हय़ातील सिंचन योजना या स्टेजवर होत्या, त्यावर मागच्या सरकारने काहीच केलेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेत 150 देशाच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत योगदिन साजरा केला. संपूर्ण जगाने मोदींच्या नेतृत्वाखाली योग स्वीकारला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात गरीब कल्याणाचा अजेंडा राबवला असून नवी कार्यसंस्कृती रूजवली आहे. 2024 सालच्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या हातात सत्ता आली तर देश गती आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणार आहे. यासाठी कार्यकर्त्यांनी त्यांचे काम घराघरापर्यंत पोहोचवले तर 2024 सालच्या सातारा लोकसभा निवडणुकीत भाजपचाच खासदार असेल. त्याचबरोबर कराड दक्षिणचा आमदारही भाजपचाच असेल. अतुल भोसले यांना 2014 साली आम्ही तत्कालीन मुख्यमंत्र्यांसमोर ढकलले. त्यांनी हिमतीने निवडणूक लढवली. यावेळी दक्षिणच्या जनतेने अतुलबाबांना निवडून देण्याचा निर्णय घेतला आहे असेही ते म्हणाले...



Wednesday, June 21, 2023

ह्रदयविकाराचा झटका सांगून माझा गेम…”, आमदार नितीन देशमुखांचं खळबळजनक विधान; सांगितला बंडाचा घटनाक्रम! नितीन देशमुख म्हणतात, “गुवाहाटीला हॉटेलमधून बाहेर आल्यावर मी पळत सुटलो,

वेध माझा ऑनलाइन । विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या काही आमदारांनी केलेल्या बंडाला एक वर्ष पूर्ण झालं. आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सरकार आहे. शिवसेनेचे विधानसभेतील ४० आमदार, १३ खासदार सध्या शिंदेंबरोबर आहेत. शिवाय शिवसेना हे पक्षनाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्हही शिंदे गटाला दिलं. मात्र, अजूनही शिवसेनेतील त्या सर्वात मोठ्या बंडाबाबत निरनिराळे दावे केले जात आहेत. यासंदर्भात शिवसेनेच्या पॉडकास्टमध्ये बंडादरम्यानच तिथून पळून आलेले आमदार नितीन देशमुख यांनी त्यांच्या पलायनाचा घटनाक्रम सांगितला आहे.

आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यादरम्यानच होणार होतं बंड?
नितीन देशमुख सध्या उद्धव ठाकरेंबरोबर राहिलेल्या आमदारांपैकी एक आहेत. शिंदेंच्या बंडावेळी तेही शिंदेंबरोबर सुरत आणि मग गुवाहाटीला गेले होते. मात्र, तिथून ते माघारी फिरले होते. मात्र, हे बंडाचं नियोजन त्याहीआधी आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यादरम्यानच करायचं होतं, असा दावा त्यांनी केला आहे.

आदित्य ठाकरे अयोध्येला रामाच्या दर्शनाला जाणार होते तेव्हाच यांचं ठरलं होतं की तिथे आमदार बोलवून तिथेच ठेवायचे. त्यावेळी मला थोडी कुणकुण लागली. एका आमदारानं माझे तिकीटंही काढले होते. पण अचानक असं कळलं की तो दौरा रद्द झाला आहे”, असं देशमुख म्हणाले.

काय घडलं त्या ४ दिवसांमध्ये?
“त्या दिवशी विधानपरिषदेची निवडणूक झाल्यानंतर एकनाथ शिंदे मला म्हणाले चल बंगल्यावर जाऊ. तेव्हा मी आणि कोल्हापूरचे आमदार आबिटकर त्यांच्या बंगल्यावर त्यांच्याबरोबर गेलो. मग तिथे संतोष बांगर आणि संजय राठोड आले. त्यांनीही काय घडतंय काही माहिती नाही असं सांगितलं. ते थोड्या वेळाने तिथून गेले. मग एकनाथ शिंदेंनी आम्हाला दोघांना गाडीत बसवलं आणि म्हणाले ठाण्याला जाऊन येऊ. पण आम्ही ठाण्याऐवजी पुढे पालघरला गेलो”, असं नितीन देशमुख म्हणाले.

“पालघरमध्ये एका हॉटेलवर मी आणि एकनाथ शिंदे उतरलो. तिथे अचानक दोन-तीन मंत्र्यांच्या गाड्या आल्या. अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, शंभूराज देसाईंची गाडी आली. मला थोडी कुणकुण लागली. तिथल्या पानटपरीवाल्याला मी तो रस्ता कुठे जातो ते विचारलं. तर तो म्हणाला हा रस्ता सूरतला जातो. तिथून १०० किलोमीटर सूरत होतं. त्यानंतर आबिटकरांना त्यांनी दुसऱ्या गाडीत बसवलं. मी, एकनाथ शिंदे, त्यांचा पीए प्रभाकर, संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार असे आम्ही शिंदेंच्या गाडीत बसलो. मग त्यांची गाडीतून फोनाफोनी सुरू झाली. तेव्हा माझी खात्री पटली की काहीतरी गडबड आहे”, असं देशमुख म्हणाले.

बायकोचं नाव सांगून सावंत साहेबांशी फोनवर बोललो”
“मी माझ्या पीएला मेसेज टाकला की असं काहीतरी घडतंय, तू सावंत साहेबांशी बोलून घे. मी सावंत साहेबांना गाडीतून फोन लावला. गाडीतल्या इतरांना कळू नये, म्हणून मी माझी बायको प्रांजलीशी बोलतोय असं नाटक करून सावंत साहेबांना फोन केला. मी म्हटलं मी सूरतला चाललो, शिंदे साहेब सोबत आहेत. दोन मंत्री बसलेत, सरकार पाडायचं वगैरे चाललंय असं सांगितलं. सावंत साहेब मला म्हणाले तू लगेच उतर गाडीतून. पण मला एकदम गाडीतून उतरता येत नव्हतं. मी म्हटलं सूरतला जाऊन पाहू आपण कोण कोण येतंय. तिथून हवंतर आपण परत येऊ”, असं ते म्हणाले.


साताऱ्यात राडा ; सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन इमारतीच्या उद्धाटनाची दोन्ही राजेंनी मारली "कुदळ' ; समर्थकांची घोषणाबाजी ;

वेध माझा ऑनलाइन । खासदार उदयनराजे भाेसले यांच्या विराेध झुगारुन सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन आज (बुधवार) आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी खिंडवाडी येथे केले. त्यानंतर आमदार भाेसले हे त्यांच्या नियाेजीत कार्यक्रमास निघून केले. आमदार भाेसले घटनास्थळावरुन जाताच खासदार उदयनराजे भाेसले यांनी त्याच ठिकाणी विविध विकासकामांचे भूमिपूजन करताच त्यांच्या समर्थकांनी घाेषणाबाजी केली. 

सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन इमारतीची जागा माझी आहे असे म्हणत आज खासदार उदयनराजे भाेसले यांनी न्यायालयाचा अवमान हाेऊ नये याची खबरदारी पाेलिसांनी घ्यावी असे आवाहन पाेलिसांना करत खिंडवाडीत भूमिपूजनाच्या ठिकाणी थांबून राहिले. दरम्यानच्या काळात शिवेंद्रसिंहराजे घटनास्थळी पाेहचले. त्यांनी जागा मार्केट कमिटीच्या नावावर असल्याचे सांगत उदयनराजे आणि पाेलिसांच्या उपस्थित कार्यक्रमस्थळी नारळ फाेडत नूतन इमारतीच्या भूमिपूजनाचा साेहळा पार पाडला आणि निघून गेले.

यानंतर खासदार उदयनराजे भाेसले यांनी घटनास्थळी त्यांच्या समर्थकांसमवेत विविध विकासकामांचे भूमिपूजन केले. त्यानंतर उदयनराजे भाेसले म्हणाले संभाजीनगर ग्रामपंचायतमधील ग्रामस्थांना विविध विकासकामांसाठी जागा नाही. त्यासाठी त्यांनी आम्हांला या जागेची मागणी केली. आज या जागेत संभाजीनगर ग्रामपंचायतीसाठीच्या विविध विकासकामांसाठीचे भूमिपूजन केले.


Tuesday, June 20, 2023

कराडात पुन्हा "त्याच' ठिकाणी चोरी ;

वेध माझा ऑनलाइन । कराडात चोऱ्यांचे प्रमाण वाढू लागल्याने दिसू लागले आहे मग  पोलीस काय करतायत... ?  असे लोक आता विचारत असतानाच दोन दिवसांपूर्वी झालेल्या ठिकाणीच पुन्हा एकदा चोरी झाल्याचे निष्पन्न झाले आहे ही चोरी देखील पोलीस स्टेशन जवळच झाल्याने चर्चेला उधाण आले आहे

दोन दिवसांपूर्वी कराड येथील प्रशासकीय इमारती नजीक एक घर एक कार्यलय व एक हॉटेल चोरट्यांनी फोडून त्या ठिकाणाहून एअर गन पिस्टल रोख रक्कम असा 50 हजाराचा मुद्देमाल चोरुन पोबारा केला होता आता पुन्हा त्याच ठिकाणी पत्रकार अक्षय मस्के यांचे कार्यालय चोरट्यांनी फोडून लॅपटॉप व इतर साहित्य चोरून नेल्याची घटना पुन्हा घडली आहे अक्षय मस्के यांनी याबाबतची तक्रार पोलिसात दिली आहे

त्याच एरियात आणि तेही पोलीस स्टेशन जवळ ही चोरीची घटना सलग दोनदा घडल्याने  पोलीस काय करतायत...? असे आता लोक विचारताना दिसत आहेत चोरांनी एक प्रकारे त्याच ठिकाणी दोन वेळा चोऱ्या करून तेथील पोलिसांना आव्हानच दिले आहे त्याठिकाणी आणखी काही चोऱ्या होण्या अगोदर आता  पोलिसांच्या झटपट कारवाईची जनतेला अपेक्षा आहे

औरंगजेबाच्या कबरीला भेट देणाऱ्या प्रकाश आबेडकरांना उद्धव ठाकरेंनी दिला सल्ला ; काय म्हणाले...

वेध माझा ऑनलाइन । नुकतेच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती संभाजीनगर इथं जाऊन औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली होती. प्रकाश आंबेडकरांच्या या कृतीवरून राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या. त्यात सत्ताधारी भाजपाने या प्रकारावरून उद्धव ठाकरेंना टार्गेट केले. कारण उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती झाली असून प्रकाश आंबेडकरांच्या या भूमिकेवर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. 

मुंबईत आज झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी याबाबत उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपासोबत आमची युती होती तेव्हा अडवाणीही जिनाच्या कबरीवर नतमस्तक झाले होते. नवाज शरीफच्या वाढदिवसाला केक खायला आपले पंतप्रधान गेले होते. लोकांना इतिहासात अडकवून ठेवण्यात आणि प्रत्येकवेळी निवडणुकीत एखादा चेहरा चालत नसेल तर तिकडे जय बजरंग बली करायचे, कधी दाऊदचा चेहरा, कधी औरंगजेबाचा चेहरा, औरंगजेबाच्या मुद्द्यावरून दंगल घडवणारे हे और दंगाबाद आहेत. यांना दंगली पेटवायच्या आहेत आणि कारभार करायचाय असा आरोप भाजपावर करत आता स्पष्ट आणि एकाविचाराने पुढे जाण्याची गरज आहे असा सल्ला प्रकाश आंबेडकरांना दिला.  
मंत्रिमंडळात महिलांना स्थान नाही 
राज्याच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही. महिलांना शिवीगाळी करणारे मंत्री होतात पण महिला मंत्री होत नाही. हे कुठले राज्य आहे असं सांगत उद्धव ठाकरेंनी शिंदे-फडणवीस यांच्या सरकारवर टीका केली.  


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कराडमध्ये गुरुवारी भव्य लाभार्थी संमेलन ; बुधवारी कराड मुक्कामी येणार; भाजपा कोअर कमिटीच्या बैठकीचे आयोजन ;

वेध माझा ऑनलाइन । भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्यावतीने देशभर महाजनसंपर्क अभियान राबविले जात आहे. या अभियानाअंतर्गत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस कराडच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी (ता. २२) सकाळी ११ वाजता कराड येथे भव्य लाभार्थी संमेलन व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.दरम्यान देवेंद्र फडणवीस बुधवारी (ता. २१) रात्री कराड येथे मुक्कामी येणार आहेत.

भारतीय जनता पार्टीच्यावतीने महाजनसंपर्क अभियानाअंतर्गत देशभर मोदी सरकारच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचविली जात आहे. या अभियानाअंतर्गत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस बुधवारी (ता. २१) रात्री कराड येथे मुक्कामी येणार आहेत. दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी (ता. २२) सकाळी १० वाजता कराड येथील शासकीय विश्रामगृहात भाजपाच्या जिल्हा कोअर कमिटीची बैठक ना. फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या बैठकीत आगामी लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकांच्या अनुषंगाने व्यापक चर्चा होणार आहे.

यानंतर सकाळी ११ वाजता कराड येथील कल्याणी ग्राऊंडवर भव्य लाभार्थी संमेलन व जाहीर सभा होणार असून, या सभेला उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस संबोधित करणार आहेत. याप्रसंगी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले, सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले, पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे, भरत पाटील, धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ, मदन भोसले, मनोज घोरपडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या लाभार्थी संमेलनाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपाच्यावतीने करण्यात आले आहे.


माणुसकी हाच धर्म ; सातारा जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख

वेध माझा ऑनलाइन . भेटीलागी जिवा लागलीसे आस … असे म्हणतच जणू वारकरी पंढरपूरच्या दिशेने पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी मार्गस्थ होत आहेत. पायी चाललेल्या वारीचे जेव्हा सातारा जिल्ह्याच्या सीमेवर आगमन होताच लोणंद येथे जिल्हाधिकारी , जिल्हापोलिस प्रमुख यांच्याकडून स्वागत करण्यात आले. यावेळी सातारा जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी वारकऱ्याची वेशभूषा तर त्यांच्या पत्निने देखील पारंपरिक वेशभूषा साकारली होती . हा पारंपरिक वेशभूषेतील त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे .

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ मध्ये ते धोतर नेसून तर त्याच्या पत्नी नऊवारी साडी नेसून वारीमध्ये सहभागी झाल्याचे दिसत आहे. याबाबत माणुसकीच हा खरा धर्म असल्याचे मत यावेळी जिल्हा पोलीसप्रमुख समीर शेख यांनी "द पिलर' च्या माध्यम प्रतिनिधींशी शी बोलताना व्यक्त केले . त्याचबरोबर सेवा हेच आमचे कर्तव्य असून आम्ही कर्तव्याला प्राधान्य देतो असे देखील ते यावेळी म्हणाले . आमच्या घरांमधून आम्हाला लहानपणापासून कर्तव्याला प्राधान्य देण्याचीच शिकवण मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले .

महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन या वारीमधून होत असते वारीमध्ये जातीभेद , धर्मभेद नसतो तर सर्वच विठ्ठलाचे वारकरी म्हणून वारीत सहभागी झालेले असतात या वारीचा आनंद घेण्याचा मोह पोलीस जिल्हा प्रमुख शेख यांना देखील आवरता आला नाही . या पालखीमध्ये पत्नीबरोबर पायी चालत काही काळ ते सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले . शेख यांनी त्यांच्या कृतीतून सामाजिक एकतेचा संदेश दिल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे

Monday, June 19, 2023

प्रियांका प्ले हाऊसला कराड पालिकेचा अल्टीमेटम ; सात दिवसात इतर परवानग्यासह खुलासा सादर करा ;प्ले हाऊसच्या अडचणीत वाढ

वेध माझा ऑनलाइन । कराडच्या कोयना कॉलनीतील प्रियांका प्ले हाऊस कराड नगर पालिकेच्या कोणत्याही परवानगीशिवाय चालवले जात असल्याचे निदर्शनास आले आहे, तरी आपल्या मालकी हक्काचे दस्तऐवज व इतर परवानग्याचा लेखी खुलासा सात दिवसात सादर करा, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे कराड पालिकेने प्रियांका प्ले हाऊसच्या चालक विमल ठक्कर व गृह निर्माण संस्थेस पत्राद्वारे कळवले आहे.

कोयना कॉलनीतील बेमुदत आंदोलनाचा आजचा नववा दिवस. कोयना गृहनिर्माण संस्थेची आदर्श उपविधी व कोणत्याही शासकीय परवानगीशिवाय अनेक वर्षांपासून येथील कोयना कॉलनीत बेकायदेशीरपणे प्रियांका प्ले हाऊस सुरू आहे. याचा आम्हा स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. त्यामुळे प्रियांका प्ले हाऊस बंद करून येथून स्थलांतरीत करण्यात यावे, या मागणीसाठी येथील मूळ निवासी, गृहनिर्माण संस्थेचे सदस्य व वारसदार बेमुदत धरणे आंदोलनास बसले आहेत. आपल्या संविधानिक मागणीची निवेदने मुख्यमंत्री महोदयांपासून प्रशासनाच्या सर्व विभागांना देण्यात आली आहेत.

या आंदोलनाची पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल ठाकूर यांनी दखल घेत कारवाईचा अल्टीमेटम दिला आहे. तर कराड पालिकेचे मुख्याधिकारी खंदारे यांनी या आंदोलनाची दखल घेतली. दि.१६ जून रोजी प्रियांका प्ले हाऊसच्या चालक विमल ठक्कर यांना पुराव्यासह लेखी खुलासा सादर करण्याठी सात दिवसाचा अल्टीमेट दिला असून कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.

ठक्कर काय पुरावे सादर करणार ?
एवढे वर्ष कोणत्याही सक्षम प्राधिकरणाच्या परवानगी अथवा ना हरकत दाखल्याशिवाय प्ले हाऊस कसे काय चालवू शकता? या पोलीस प्रशासनाच्या प्रश्नावर निरुत्तर झालेले  तसेच कोणत्याही परवानग्या, ना हरकत दाखले सादर करण्यास अपयशी ठरलेले ठक्कर पालिकेला नेमका काय पुरावा व खुलासा सादर करणार याकडे लक्ष लागू राहिले आहे.

कराड एसटी आगाराचा मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते गौरव ; काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाइन । महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडुन महाराष्ट्रातील आयडॉल बसस्थानकाची निर्मीती करण्यात आली आहे. कराड येथील एसटी आगारातील अधिकारी, कर्मचारी यांनी सामुहीक प्रयत्नातुन उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील २५० एसटी आगारामध्ये दुसरा क्रमांक पटकावला आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कराड येथील एसटी आगाराच्या व्यवस्थापिका शर्मिष्ठा पोळ आणि आगार व्यवस्थापक कुलदीप डुबल यांचा सत्कार करण्यात आला. 

  कऱ्हाडमध्ये जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षात अनेक कामे करण्यात आली. त्याअंतर्गत सुमारे ११ कोटी रुपये खर्च करुन कराड येथे आमदार पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या संकल्पनेतुन येथील एसटी बसस्थानक राज्यातील आयडॉल बसस्थानक करण्यात आले. त्या बसस्थानकातुन नेहमीच प्रवाशांच्या सेवेचे चांगले काम केले जाते. परिवहन महामंडळाने २०२२-२०२३ या कालावधीत मूल्यांकन फल निष्पत्तीची राज्यातील २५० आगारांची माहिती संकलीत केली. त्यामध्ये असलेल्या २० परिमाणके तपासण्यात आली. त्यातील सर्वात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आगारांपैकी एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून नऊ आगारांची निवड करण्यात आली आहे. त्या नऊ आगारांपैकी येथील एसटी आगाराने सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या सामुहिक प्रयत्नातुन परिमाणके पुर्ण केली.त्यामध्ये केवळ ७८ बसेसव्दारे ९९.६४ लाख किलोमीटरचा प्रवास, ४७.४४ कोटी उत्पन्न आणि १३०.९१ लाख प्रवाशांची वाहतुक करुन राज्यात दुसरा क्रमांक पटकावला. त्याबद्ल मुंबई येथील एसटी महामंडळाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते येथील एसटी आगाराच्या व्यवस्थापिका सौ. पोळ, आगार व्यवस्थापक श्री. डुबल यांचा सत्कार करण्यात आला.

ठाकरे गटाला राष्ट्रवादी देणार जोर का झटका !! विधान परिषद विरोधी पक्षनेते पदावर करणार दावा ; पहा कोणाची नावे आहेत पुढे...

वेध माझा ऑनलाइन । विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे विधान परिषदेमधील ठाकरे गटाचे संख्याबळ कमी झाले आहे. याआधी विप्लव बाजोरिया यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. ठाकरे गटाचे दोन आमदार शिंदे गटात गेल्याने उद्धव ठाकरेंची  शिवसेना आणि राष्ट्रवादि यांचे संख्याबळ सारखे झाले आहे. यानंतर आता राष्ट्रवादीने विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर दावा केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाच्या अडचणी वाढू शकतात.

राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ  यांनी सोमवारी याबाबत भूमिका स्पष्ट केली. तर आमदार अमोल मिटकरी यांनी एकनाथ खडसे हे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते झाले पाहिजेत, असे म्हटले आहे. शिवसेना ठाकरे गटाची सदस्य संख्या एक ने कमी झाली, आता ज्याचे सदस्य जास्त त्याच्याकडे विरोधी पक्षनेते पद असावे, असे मिटकरी यांनी म्हटले आहे त्यामुळे राष्ट्रवादी उद्धव ठाकरेंना धक्का देणार का? अशी चर्चा रंगली आहे.

नरहरी झिरवाळ यांनी बोलताना सांगितले की, विरोधी पक्षनेते पदावर आम्ही दावा करणार आहोत. अमोल मिटकरी आणि नरहरी झिरवाळ यांच्या दाव्यानंतर ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांचं विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद धोक्यात येण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस याबाबत काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विधान परिषदेत ठाकरे गटाकडे 10 तर शिंदे गटाकडे एक आमदार होता.तसेच राष्ट्रवादीकडे 9 तर काँग्रेसकडे 8 आमदार  असून 5 अपक्ष आमदार आहेत.त्यापैकी किशोर दराडे यांनी ठाकरेंना तर सत्यजीत तांबे यांचा काँग्रेसला पाठिंबा आहे. दराडे यांनी पाठिंबा बदलला तर मात्र गेम बदलू शकतो.दरम्यान, मनिषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे आता विधान परिषदेत ठाकरे गटाचे आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी 9 आमदार आहेत.

बाजारातून ८८ हजार कोटींच्या ५०० रुपयांच्या नोटा गायब ! ; वाचा...आर.बी. आय. चे स्पष्टीकरण -


वेध माझा ऑनलाइन । आरटीआय कार्यकर्ते मनोरंजन रॉय यांनी काही प्रश्न विचारल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये व्हायरल झाले होते. प्रतिसादात नवीन डिझाईन असलेल्या ५०० रुपयांच्या लाखो नोटा गायब झाल्याचे सांगण्यात आले.

बाजारातून ५०० रुपयांच्या नोटा गायब झाल्याच्या वृत्ताचे आरबीआयने खंडन केले असून, केंद्रीय बँकेने याबाबत स्पष्टीकरण जारी केले आहे. अर्थव्यवस्थेतून मोठ्या प्रमाणात ५०० रुपयांच्या नोटा गायब झाल्या आहेत. त्यांची किंमत ८८,०३२.५० कोटी रुपये आहे, असा एका आरटीआय अहवालाचा हवाला देत मीडिया रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला होता. परंतु आरटीआयमधून मिळालेल्या माहितीचा चुकीचा अर्थ लावल्यामुळे असे झाल्याचे केंद्रीय बँकेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. देशातील तीन प्रिंटिंग प्रेसमधून ५०० रुपयांच्या नोटांबाबत आरटीआय अंतर्गत दिलेल्या माहितीचा चुकीचा अर्थ लावला गेला आहे. रिझर्व्ह बँकेला प्रिंटिंग प्रेसमधून दिलेली प्रत्येक नोट मोजली जाते, असे केंद्रीय बँकेने म्हटले आहे. यासाठी मजबूत यंत्रणा आहे. आरबीआयने लोकांना अशा प्रकरणांत केवळ मध्यवर्ती बँकेने दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

यापूर्वी आरटीआय कार्यकर्ते मनोरंजन रॉय यांनी काही प्रश्न विचारल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये व्हायरल झाले होते. प्रतिसादात नवीन डिझाईन असलेल्या ५०० रुपयांच्या लाखो नोटा गायब झाल्याचे सांगण्यात आले. त्याची किंमत ८८,०३२.५ कोटी रुपये आहे. देशातील तीन प्रिंटिंग प्रेसने ५०० रुपयांच्या ८८१०.६५ दशलक्ष नोटा नवीन डिझाइनसह छापल्याचा दावा करण्यात आला होता, परंतु रिझर्व्ह बँकेला या नोटांपैकी केवळ ७२६० दशलक्ष नोटा मिळाल्या. एकूण ५०० रुपयांच्या १७६०.६५ दशलक्ष नोटा गहाळ झाल्या, ज्यांचे मूल्य ८८,०३२.५ कोटी रुपये आहे. RBI ची छापखाने बंगळुरू, देवास आणि नाशिक येथे आहेत.

धक्कादायक! ३० वर्षीय महिलेची प्रियकराने ऑटोरिक्षात केली हत्या, मुंबईतील घटनेनं खळबळ ;

 वेध माझा ऑनलाइन । मुंबईच्यासाकीनाका परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका ३० वर्षीय महिलेची तिच्या प्रियकराने ऑटोरिक्षात हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे जोडपे रिक्षातून प्रवास करत होते. मुंबईतील साकीनाका परिसरातील खैरानी रोडवर ही घटना घडली. महिलेशी वाद झाल्यानंतर आरोपीने महिलेचा गळा चिरून ऑटोमध्ये बसून तिथून पळ काढला. पण पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. 

मुंबईतील या धक्कादायक घटनेनंतर राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. अलीकडेच मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये एका तरूणीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली होती. 

साकीनाका येतील घटनेचा दाखला देत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केला आहे. "साकीनाका, मुंबई येथे एका महिलेचा भररस्त्यात गळा चिरून खून करुन आरोपी पसार झाला. ही अतिशय संतापजनक घटना आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असून महिला सुरक्षित नाहीत. गुन्हेगार मोकाट असून नागरिक दहशतीखाली आहेत. राज्याच्या गृहमंत्र्यांनी यासंदर्भात वैयक्तिक लक्ष घालून तपास यंत्रणा सक्रिय करणे आवश्यक आहे. गुन्हेगारांना कायद्याची जरब बसणे गरजेचे आहे", असे सुप्रिया सुळे यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले. 



ज्यांना बौद्धिक उंची नाही असे लोक आमच्याबद्दल गैरसमज पसरवत आहेत ; उदयनराजेंची शिवेंद्रराजेंवर टीका

वेध माझा ऑनलाइन । माझे आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे सलोख्याचे सम्बन्ध आहेत पण ज्यांना बौद्धिक उंची नाही असे लोक विनाकारण आमच्या दोघांमध्ये गैरसमज पसरवत आहेत अशा भाषेत खा उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर टीका केली

शिवेंद्रराजे यांनी काल टीका करताना उदयनराजे व पालकमंत्री यांच्यात इगो वॉर सुरू असून त्यात सातारकर विनाकारण अडकले आहेत अशी टीका केली होती त्यावर उत्तर देताना जलमंदिर येथे ते माध्यमांशी बोलत होते

उदयनराजे म्हणाले,  यशवंतराव चव्हाण किसनवीर यांची स्मारके आहेत मग बाळासाहेब देसाई यांचेही स्मारक व्हावे त्यांचे कार्य मोठे आहे आमचा त्याला विरोध नाही पण या विषयाबाबत पालकमंत्री अद्याप मला चर्चा करण्यासाठी भेटले नाहीत स्मारकाबाबत जे होईल ते कायद्याने होईल त्यांचे आणि माझे सलोख्याचे सम्बन्ध आहेत पण ज्यांची बौद्धिक उंची कमी आहे असे लोक आमच्या दोघात गैरसमज पसरवत आहेत या स्मारकाला माझा विरोध असल्याचे भासवत आहेत शिवतीर्थ परिसर हा ऐतिहासिक आहे त्याचे पावित्र्य महत्वाचे आहे त्याठिकाणी सुशोभीकरण अधिक कसे करता येईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असेही राजे म्हणाले

सातारा जिल्ह्यातील 14 कृषी सेवा केंद्राचे परवाने कायमचे रद्द ; सातारा कृषी विभागाची कारवाई

वेध माझा ऑनलाइन । सातारा जिल्ह्यातील 14 कृषी सेवा केंद्राचे परवाने सातारा कृषी विभागाने कायमचे रद्द केल्याचे आज कृषी विकास अधिकारी विजय माईंकर यांनी माध्यमांना सांगितले आहे

यामध्ये 9 खत विक्रेते आहेत 3 बियाणे विक्रेते आहेत तर 2 कीटक नाशक विक्रेते यांचा समावेश आहे भरारी पथकाच्या वतीने सध्या कृषी केंद्र तपासणी सुरु आहे अशा प्रकारच्या केंद्रातून संबंधित अवजारांची जादा दराने विक्री करण्यासारखे गैरप्रकार आढळून आल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी दुडी यांनी या पार्शवभूमीवर दिला आहे