काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना लक्ष्य करताना 1977 साली स्थापन केलेल्या सरकारचा संदर्भ दिला. 1978 मध्ये शरद पवार हे वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळातील 40 आमदार घेऊन बाहेर पडले होते. त्यांनी त्यावेळच्या भाजपाबरोबर सरकार स्थापन केले. ते सरकार दोन वर्षे चालले. पंतप्रधान इंदिरा गांधींनी ते सरकार बरखास्त केले नसते तर ते सरकार पाच वर्षे चालले असते. म्हणजे तेव्हा पवारसाहेबांनी जे केले ते ‘मुत्सेद्देगिरी’ आणि तेच एकनाथ शिंदे यांनी केले तर गद्दारी? असं कसं चालेल? असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला.
तेव्हा फडणवीस लहान असतील
देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावर शरद पवार यांनी सोमवारी सकाळी पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर देताना खोचक टोला लगावला. मी कधी मुत्सद्देगिरी केली? त्यांनी सांगावे. 1977 साली आम्ही सरकार बनवलं. पण त्यावेळी भाजप माझ्यासोबत होती. तेव्हा देवेंद्र फडणवीस लहान असतील. त्यामुळे त्यांना कळलं नसेल. त्यांना कदाचित पुरेसा इतिहास माहिती नसेल. पण त्यांच्या माहितीसाठी सांगतो, मी सगळ्यांना घेऊन सरकार बनवलं होतं. त्यावेळच्या जनसंघाचे उत्तमराव पाटील उपमुख्यमंत्री होते. इतरही काही सदस्य होते, असे शरद पवार म्हणाले.
अज्ञानापोटी असं वक्तव्य
शरद पवार पुढे म्हणाले, मला वाटतं देवेंद्र फडणवीस कदाचित तेव्हा प्राथमिक शाळेत असतील. त्यामुळे त्यांना तेव्हाची फारशी माहिती नसेल. ते अज्ञानापोटी असं वक्तव्य करत आहेत. यापेक्षा काही फारसं भाष्य करण्याची आवश्यकता नाही, असा टोला त्यांनी लगावला.
No comments:
Post a Comment