वेध माझा ऑनलाईन - राज्यात काही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच आहे. मात्र, एसटी महामंडळाने संपकरी कर्मचाऱ्यांना नोटीस बजावूनही कामावर रुजू न झालेल्यांना बडतर्फ करुन घरी पाठवले. आता त्यापुढचे मोठे पाऊल उचलत नव्याने भरती प्रक्रिया सुरु केली आहे.
राज्यात एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप मिटत नसल्याचे चित्र आहे. राज्य सरकार संप मिटवण्यासाठी पूर्ण प्रयत्नशील आहे. मात्र कर्मचारी विलनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम असल्याचे दिसून येत आहे. अद्याप काही एसटी कर्मचारी संपावर आहेत. मात्र, यातच एसटी महामंडळाने नव्याने कर्मचाऱ्यांनी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळाने नवी भरती प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली आहे.
एसटीच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरुच आहे. एसटीच्या उर्वरित 55 हजार संपकरी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. आतापर्यंत एकूण बडतर्फ कर्मचारी संख्या 1144 असून एकूण निलंबित कर्मचारी संख्या 11024 इतकी आहे.
No comments:
Post a Comment