वेध माझा ऑनलाइन - महाराष्ट्रात ओमिक्रॉन व्हेरिएंट आणि कोरोना यांचा संसर्ग झपाट्याने वाढतो आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत टास्क फोर्स आणि आऱोग्य विभागाची बैठक पार पडली. त्या नंतर राजेश टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सध्या लॉकडाऊन लावण्याचा विचार नाही मात्र कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येला आळा घालायचा असेल तर गर्दी टाळली पाहिजे. गर्दी जिथे होते तिथे नियंत्रण आणलं गेलं पाहिजे. राज्यात लॉकडाऊन लागणार नसला तरीही निर्बंध येतील आणि त्यासंदर्भातला अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.याचवेळी राज्यातील 70 आमदार आणि 15 मंत्री करोनाबाधित असल्याचे ते म्हणाले. हे सर्व दररोज कामानिमित्त फिरायचे. लोकांच्या सातत्याने संपर्कात होते. त्यामुळे या आमदार आणि मंत्र्यांना करोनाचा संसर्ग झाल्याची माहितीही त्यांनी दिली.
दरम्यान,राज्यात कोरोनाचे संकट गहिरं होताना दिसत असून ना अजित पवार यांनी यावेळी राज्यात नेमकी काय स्थिती आहे याचा आज टास्क फोर्सकडून आढावा घेतला. मंत्रालयातल्या बैठकीचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सोपवला जाणार आहे. त्यानतंर मुख्यमंत्री कोणते निर्बंध लावायचे यासंबंधी निर्णय़ घेणार आहेत. त्यानुसार काही कडक निर्बंध लावले जाण्याची शक्यता आहे. आज रात्री यासंबंधी नियमावली जाहीर होण्याची शक्यता आहे.
No comments:
Post a Comment