Monday, October 31, 2022

आदित्य ठाकरेंची सडेतोड पत्रकार परिषद ; दिले देवेंद्र फडणवीस यांना थेट चॅलेंज ; काय आहे ते चॅलेंज?...

वेध माझा ऑनलाइन - महाराष्ट्रातून एकापाठोपाठ एक प्रकल्प गुजरातमध्ये जात आहे. ‘वेदांता फायरफॉक्स’ आणि ‘टाटा-एअरबस’ यानंतर आता आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याने सत्ताधारी-विरोधकांमधील वाद चिघळण्याची शक्यता आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला पळवले जात असल्याचे राजकीय आरोपही होत आहेत. हा वाद सुरू असतानाच शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धारेवर धरले. या खोके सरकारमुळे राज्य मागे पडत असल्याचा आरोपही ठाकरेंनी केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी आव्हान दिलं आहे.

आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत शिंदे-फडणवीस यांच्या आरोपांना प्रत्त्युत्तर दिलं. ह्या डबल इंजिन सरकार आपलं अपयश झाकण्यासाठी आमच्यावर आरोप करत असल्याचे ते म्हणाले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी समोरासमोर बसून चर्चा करण्यास तयार असल्याचं आव्हान केलं आहे.


आदित्य ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
मुख्यमंत्र्यांकडून उत्तर अपेक्षित होते. परंतु, उपमुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले. पॉवर कुणाकडे आहेत ते कळले. मुख्यमंत्र्यांनी स्क्रिप्ट वाचून दाखवले तरी चालेल.

उद्योग बाहेर जाण्याची मालिका सुरू

वेदांतापेक्षा मोठा उद्योग आणणार होते. दीड लाख कोटी कुठे व दोन हजार कोटी रूपये कुठे?

भाजप सरकार असताना अशा घोषणा होत नव्हत्या

23 मे 2022 मध्ये डावोसमध्ये असताना रायगडमध्ये 20 हजार कोटींचा प्रकल्प एमवोयू केले होते. पण त्याचे क्रेडीट हे सरकार घेतंय.

उपमुख्यमंत्र्यांना चुकीचे ब्रिफिंग मिळालंय. फोक्सकॉनचा वेगळा प्रकल्प आहे तर वेदांता फोक्सकॉनचा वेगळा प्रकल्प आहे. त्यामुळं बदनामी करू नका

वेदांता फॉक्सकॉन बाबत मी टाईमलाईनही देतोय. 24 फेब्रूवारी 2022 ला पुण्यात जावून साईट व्हिजिट केली होती.

गुजरातपेक्षा 10 हजार कोटी जास्त सबसिडी दिली होती

वेदांता फॉक्सकॉनच्या तुलनेत सध्याची गुंतवणूक खूप छोटी

सप्टेंबर 2021 मध्ये गुजरातमध्ये जाणार होते, तर मग ते आमच्यासोबत काय टाईमपास करत होते का?

खोके सरकारप्रमाणे हे खोटे सरकार आहे

बल्क ड्रग पार्क व मेडिकल डिव्हाईस पार्कसाठी प्रस्ताव केंद्राकडे पाठवले आहेत. प्रस्ताव पाठवला नाही हे चुकीचे आहे.नियोजन विभागाच्या अमिताभ कांतना भेटले होते सुभाष देसाई.

मी देवेंद्र फडणविसांना चँलेंज करतो की त्यांनी टाटाच्या त्या संबंधित अधिका-याचे नाव सांगावे

आपले अपयश झाकण्यासाठी ते केंद्राला दोष देतायत असं वाटतंय.

नोकरीसाठी आंदोलन करणा-यांना शेंबडी पोर म्हणणं अपमानकारक आहे. शब्द मागे घ्या..पत्रकारांनाही एचएमव्ही पत्रकार संबोधले गेले.

समृद्धीचे उद्घाटन होवू नये म्हणून तो पूल पाडला गेला का? अजून का उद्धाटन का केले गेले नाही. सीएमनी स्पष्ट करावं.

उपमुख्यमंत्री असेही बोलले की बाकी आमदारांनी 50 खोके घेतले असा याचा अर्थ नाही. 50 खोके प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे.

तत्कालीन UD मंत्र्यांना कॉर्नर करायचा प्रयत्न आहे का? पुणे नागपूरचीही चौकशी करावी. मुंबईची बदनामी केली जातंय.

राखरांगोळी करणारे प्रकल्प राज्यात आणले जातायत. नाणारला स्थानिकांचा विरोध होता. बारसूबाबतही तीच भूमिका आहे. लोकांसोबत आम्ही आहोत.


 

No comments:

Post a Comment