वेध माझा ऑनलाइन - अंधेरी पोटनिवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवण्यात आल्यामुळे मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आता शिवसेनेकडून तीन चिन्ह आणि तीन नावं निवडणूक आयोगाकडे पाठवले आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर 'मातोश्री'वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना नेत्यांची बैठक पार पडली. बैठकीनंतर अरविंद सावंत यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.
अंधेरी पोटनिवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवण्यात आल्यामुळे मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आता शिवसेनेकडून तीन चिन्ह आणि तीन नावं निवडणूक आयोगाकडे पाठवले आहे.
'मी भाजपशी लढलो, कुटुंबातील लोकांशी लढलो. ही लढाई लढून मी आपल्या पक्षाचे 63 आमदार निवडून आणले.आता ही शेवटची निवडणूक आहे. आता आपण जिंकलो तर आपण पुन्हा सगळं मिळवलं असेही ते यावेळी म्हणाले
शिवसेनेकडून उगवता सूर्य, मशाल आणि त्रिशूल ही तीन चिन्हं ठरवण्यात आली आहे. तसंच शिवसेना बाळासाहेब ठाकरे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रबोधनकार ठाकरे अशी नावं देण्यात आली आहे, अशी माहिती अरविंद सावंत यांनी दिली.
No comments:
Post a Comment