वेध माझा ऑनलाइन ; राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे राजकारणात खळबळ उडाली असून नवीन अध्यक्ष कोण होणार याची चर्चा रंगली आहे. पण, आता खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाची चर्चा आघाडीवर आहे अशी माहिती खुद्द प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.
दरम्यान मला याबाबत झालेल्या आजच्या बैठकी विषयी कोणतीही माहिती नव्हती असेही जयंत पाटील म्हणाले
राष्ट्रवादीची आज सकाळी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी सगळेच नेते हजर होते. पवार यांनी जी समिती नेमली होती त्या समितीची ही बैठक होती. या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.
पवार साहेबांच्या नेतृत्वामुळे देशात पक्ष वाढला आहे. देशभरात कार्यकर्ते हे त्यांच्या नावामुळे जोडले आहे. महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांच्या मनात वेगळा विचार येणार नाही. आम्ही आज सांगतोय, त्यांनी ही निर्णय बदलावा. आमचा पहिला प्रयत्न आहे की, पवार साहेबांनी अध्यक्ष राहावं, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत त्यांनीच राहावं अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे, असंही पाटील म्हणाले.
दरम्यान मला या आजच्या बैठकी विषयी कोणतीही माहिती नव्हती. या बैठकीला मला बोलावलं नव्हतं. कदाचित या बैठकीला बोलावण्यासाठी येण्याची आवश्यकता नसेल. सर्वच बैठकींना हजर राहावं असं काही नसतं. असा खुलासाही जयंत पाटील यांनी एका माध्यम प्रतिनिधींशी बोलताना केला .
No comments:
Post a Comment