Friday, December 16, 2022

विजय दिवस पुरस्कार सोहळा की राष्ट्रवादीचा इव्हेंट ; कराडात चर्चा;

वेध माझा ऑनलाइन - विजय दिवस समारोह समितीतर्फे दिला जाणारा यंदाचा जीवन गौरव यशवंत पुरस्कार माजी राज्यपाल खासदार श्रीनिवास पाटील यांना माजी गृहमंत्री आमदार दिलीप वळसे- पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. स्वातंत्र्य सैनिकांच्या कार्यक्रमात एका राष्ट्रवादीच्या नेत्याच्या हस्ते राष्ट्रवादीच्याच दुसऱ्या नेत्यांला हा पुरस्कार देण्यात आला..दरम्यान हा पुरस्कार स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या एखाद्या वीर सैनिकाला देण्यात येईल अशी कराडकरांना अपेक्षा होती...कर्तव्यदक्ष खासदार श्रीनिवास पाटील याना हा पुरस्कार देण्यात आला याचेही समाधान कराडकराना नक्कीच आहे...दरम्यान या कार्यक्रमात एक गोष्ट मात्र आवर्जुन लक्षात आली ती म्हणजे...पुरस्कार ज्यांच्या हस्ते दिला ते राष्ट्रवादीचे...ज्यांना दिला तेही राष्ट्रवादीचे...आणि ज्यांच्या उपस्थितीत दिला तेही सर्व राष्ट्रवादीचेच नेते होते...मग हा सोहळा म्हणजे राष्ट्रवादीचा इव्हेंट होता का?असा प्रश्न कराडकरांना यानिमित्ताने पडला...

कारण विद्यमान सरकारचे कोणीही मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्रीही या कार्यक्रमास उपस्थित दिसले नाहीत कराडचे आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि इतर कोणी काँग्रेस नेतेही यावेळी दिसले नाहीत एकूणच या सर्व नेत्यापैकी कोणी आयोजकांना उपलब्ध झाले नसतील कदाचित... तरी दुसरे इतर कोणीही राज्याचे नेते किंवा पदाधिकारी  नक्कीच उपलब्ध झाले असते... आणि हा कार्यक्रम सर्वसमावेशक झाला असता पण तसे झाले नाही...हा कार्यक्रम एकाच राजकीय पक्षाचा इव्हेंट वाटला अशी चर्चा आहे !.  


यावेळी ब्रिगेडीयर जेम्स थॉमस यांच्यावतीने मेजर मिश्रा यांनी तर साताऱ्याचे पोलिस अधिक्षक समीर शेख यांच्यावतीने पोलिस उपाधिक्षक डॉ. रणजीत पाटील यांनी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, वीर माता श्रीमती यशोदाबाई चव्हाण, तळबीड (ता. कराड), आदर्श माता बाळुताई ढेबे, (कापील), आदर्श विद्यार्थीनी अमृता पाटील (लाहोटी कन्याप्रशाला कराड) तर आदर्श विद्यार्थी सोहेल मुलाणी (वेणुताई चव्हाण कॉलेज, कराड) यांचाही मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात करण्यात आला.
आमदार बाळासाहेब पाटील, विजय दिवस समितीचे प्रमुख कर्नल संभाजीराव पाटील, सचीव अॅड. संभाजीराव मोहिते यांच्यासह समितीचे पदाधिकारी, सदस्य यावेळी उपस्थित होते. 
आ. दिलीप वळसे- पाटील म्हणाले, जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांचा वारसा लाभलेल्या भुमीत कर्नल संभाजीराव पाटील यांच्या माध्यमातुन खासदार श्रीनिवास पाटील यांनी देण्यात आलेला पुरस्कार हा मोठा आहे. या पुरस्काराला साजेश काम खासदार पाटील यांनी केले आहे. कर्नल पाटील यांनी सामान्य लोकांनी मिल्ट्रीचे वातावरण कसे असते, त्यांचे जीवन कसे असते हे जवळुन दाखवण्याचे काम केले आहे. त्यांचे समाजासाठीचे, तरुण पिढीसाठीचे योगदान मोठे आहे. 
खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या सानिध्यात मी वाढलो.  भारतीय सैन्यदलाची शिस्त कराडकरांना लावण्यात कर्नल संभाजीराव पाटील यांचे मोलाचे योगदान आहे. मी पुण्याचा कलेक्टर, नागपुरचा आयुक्त म्हणुन काम करुन लोकांची सेवा केली. कर्नल संभाजीराव पाटील यांनी कराडला सैन्यदलाची माहिती व्हावी, यासाठी विजय दिवस समारोह साजरा केला. त्यांचे योगदान मोठे आहे. जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण, पी. डी. पाटील यांच्या भुमीत मला विजय दिवस समारोह समितीने यशवंतराव यांच्या नावाने देण्यात आलेला जीवन गौरव पुरस्कार हे मी माझे भाग्य समजतो.

No comments:

Post a Comment