वेध माझा ऑनलाइन - राज्यसभा निवडणुकीत पराभवाला सामोरं गेलेल्या शिवसेनेनं विधान परिषद निवडणुकीमध्ये परतफेड केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अचूक प्लॅनिंग करून शिवसेनेनं विजयाचा नारळ फोडला आहे. शिवसेनेचे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहे. शिवसेनेचे उमेदवार सचिन आहिर आणि आमशा पाडवी विजयी झाले आहे.
विधान परिषदेच्या 10 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. 10 जागांसाठी 11 उमेदवार मैदानात असल्यामुळे त्यातच गुप्त मतदान असल्यामुळे कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येणार याची कमाली उत्सुकता शिगेला पोहोचली होती. राज्यसभा निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी चमत्कार घडवत भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी झाले होते. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार संजय पवार पराभूत झाले होते. त्यामुळे विधान परिषदेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व सूत्र आपल्या हातात घेतली होती. त्यांनी सर्व आमदार आपल्याच देखरेखीखाली ठेवली होती. मतदानाच्या दिवशीही मुख्यमंत्र्यांनी सर्व आमदारांशी चर्चा करूनच मतदानाला पाठवले होते. यावेळी शिवसेनेनं कोणताही दगाफटका नको म्हणून आपल्याच आमदारांच्या संख्याबळावर आपले उमेदवार विजयी करण्यावर भर दिला होता.
No comments:
Post a Comment