वेध माझा ऑनलाइन - राज ठाकरे यांचं भाषण ऐकून उद्वैग झाला. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीवर डोकं टेकवायला आहे. शेवटी बाळासाहेबांनी अनेकांना घडवलं. त्यांच्यामध्ये हे सुद्धा घडले होते. परंतु हे कसे काय बिघडले, हा मोठा प्रश्न पडला आहे, असा सणसणीत टोला शिवसेनेच्या नेत्या आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी लगावला.राज ठाकरे यांच्या भाषणाची स्क्रिप्ट भाजपने पाठवली होती...असेही त्या म्हणाल्या...
माजी महापौर किशोरी पेडणेकर या शिवतीर्थावर बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी आल्या होत्या. यावेळी राज ठाकरे यांच्या भाषणावर प्रतिक्रिया दिली.
'कालचा दिवस महाराष्ट्रासाठी चांगला होता त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषा भवनाचे भूमिपूजन केले येत्या काही काळात मेट्रो चे उद्घाटन करतील. संध्याकाळी राज ठाकरे यांच्या भाषणाचे स्क्रिप्ट भाजपने पाठवली होती. त्या सारखेच भाषण होते. लोक फेसबुक, ट्वीटरवर विचारत आहे लाव रे तो व्हिडीओ कुठे गेला? महागाई इतकी वाढली आहे. भाव गगनाला भिडले आहे. याबद्दल दोन शब्द सुद्धा राज ठाकरे भाषणात बोलले नाही. याचा अर्थ उद्धव ठाकरे द्वेष, शिवसेनेचा द्वेष हे दिसून येत आहे. यासाठीच पक्ष काढला होता का, असा प्रश्न प्रत्येक शिवसैनिकाला पडायला लागला आहे, असंही पेडणेकर म्हणाल्या.
'घरच्यांचा पण द्वेष इतका असावा का, तुझं माझं पटत नाही, असं महिला प्रमाणे वागत आहे. भाजप मांडीवर ही घेत नाही आणि हे म्हणताय मला घ्या ना, असं सुरू आहे. मुंबईत शिवसेनेचा द्वेष करून आतापर्यंत कुणी मोठे झाले नाही, असंही पेडणेकर यांनी राज ठाकरेंना बजावले.
'बाळासाहेबांचा उत्तराधिकारी हे केवळ उद्धव ठाकरे यांना जनता समजते डुबलिकेट लोक उत्तराधिकारी होत नाही २ वर्षे यांची मोरी तुंबली. त्या काळात आम्ही काम केले. कायद्याची आणि कायद्याची लढाई ही सुरू आहे.ईडीची नोटीस आल्यावर अनेकांची भूमिका बदलली. मनसे ही भाजपची बी कंपनी आहे, अशी टीकाही पेडणेकर यांनी केली.
No comments:
Post a Comment