वेध माझा ऑनलाईन। राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महापालिका निवडणुकांबाबत मोठे वक्तव्य केले आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणूक आम्ही लांबवल्या नाहीत. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने अनेक याचिका दाखल केल्यामुळेच लांबल्या आहेत, असा आरोप करत फडणवीसांनी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये बीएमसी निवडणुका होतील, असा अंदाज व्यक्त केला आहे.
एका मुलाखतीत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “आम्ही निवडणुका लांबवल्या नाहीत. निवडणुका व्हाव्यात असे आम्हालाही वाटते. उद्धव ठाकरेंच्या पक्षाने भरपूर याचिका न्यायालयात दाखल केल्या, आरक्षणाबाबतची एक याचिका सुद्धा आहे. सर्वोच्च न्यायालयाने सर्व याचिका एकत्र केल्या आहेत आणि स्टेटस को दिला. या स्टेटस कोमुळे निवडणुका होऊ शकल्या नाहीत. ज्यावेळी स्टेटस को हटेल आणि निकाल येईल, तेव्हा निवडणुका होतील. उद्धवजी बोलतात की तुम्ही निवडणुका का घेत नाही तेव्हा मला आश्चर्य वाटते. तुम्ही याचिका दाखल केल्या, तुम्ही त्या मागे घ्या. दोन्ही बाजूंनी का बोलता? हे राज्य सरकारच्या हातात नाही. माझ्या अंदाजाने ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निकाल येईल आणि निवडणुका पण होतील.”
पुढे फडणवीस म्हणाले, “महापालिका निवडणुका आम्ही शिवसेनेच्या सोबत लढणार आहोत,” असे ते म्हणाले, तसेच महाविकास आघाडी स्ट्रॅटेजिक अलायन्स करेल. याचा अर्थ म्हणजे काही ठिकाणी युती केली तर त्यांचे नुकसान होईल आणि आम्हाला फायदा होईल. अशा ठिकाणी ते स्वतंत्र लढतील
No comments:
Post a Comment