दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मन वळवण्यात शरद पवार यशस्वी झाल्याचं शरद पवार यांच्या एकूणच वक्तव्यावरून दिसून येतं. त्यामुळे अजित पवार स्वगृही परततील असा दावा नाना पटोले यांनी केला आहे. महाविकास आघाडीत शरद पवारांबाबत कोणताही संभ्रम नसल्याचेही पटोले म्हणाले. महाविकास आघाडी म्हणून आम्ही शरद पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.जे पक्ष भाजपाविरोधात लढायला येतील त्यांना आम्ही सोबत घेऊ.
आम्ही महायुती सोबतच :
सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या आधारे आम्ही सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. आम्ही निवडणूक आयोगालाही तसे कळवलं आहे. आमच्या दृष्टीनं कोणताही गोंधळ नाही. आम्ही एनडीएच्या बैठकीला गेलो होतो. अजित पवारांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे. आम्ही बीडमध्ये सभा घेत आहोत. निवडणुकीला अजून सात ते आठ महिने आहेत. आम्ही महायुतीत निवडणुका लढवणार असून राज्यात वेगळे निकाल पाहायला मिळतील, असा विश्वास अजित पवार गटाचे प्रवक्ते सुनील तटकरे यांनी व्यक्त केला.
पवार काय म्हणाले ते ऐकलं नाही. सुप्रिया काय म्हणाल्या ते ऐकलं. एकीकडे 9 मंत्र्यांवर कारवाई होणार, असं शरद पवार गटाने म्हटलं आहे. तर दुसरीकडे आमचेच नेते असल्याचं ते सांगतात. हा विरोधाभास आहे. काँग्रेसचे महान नेते काय म्हणाले ते मला माहीत नाही. काँग्रेसने आपले घर सांभाळावे.असंही तटकरे यांनी म्हटलं आहे.
No comments:
Post a Comment